शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:26 IST

पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देकबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीलामंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळे मदतीला; पायाभरणी

कोल्हापूर : पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेच्या परिसरात कबुरे यांचा दगडी वाडा दिमाखात उभा होता. तीन मजली इमारत या कुटुंबीयांची शान होती. तब्बल आठ खोल्या असलेला हा वाडा ८ दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने जमीनदोस्त झाला. शुक्रवार पेठेतील हे कुटुंब बेघर झाले. यात सरकारी पंचनामे झाले. अत्यल्प अनुदानही मिळाले.यासोबतच धनंजय महाडिक युवाशक्तीने संसार सेट, तर प्रायव्हेट हायस्कूलच्या एका गु्रपने धनादेश देत मदत दिली. तरीही हे घर उभारणे अशक्य होते; त्यासाठी पुन्हा धाऊन आली कोल्हापूरकरांची माणुसकी. यात मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निरीक्षण केले. त्यांनी कबुरे कुटुंबीयांना पहिली मदत देण्याचा निर्धार केला.

त्यानुसार पैशांची जुळवाजुळव करीत नऊ लाख रुपयांचे तीन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्धार केला. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करीत, घर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, राजू भोसले, रमेश पोवार, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.कबुरे कुटुंबीय पुन्हा सावरणारसीमा कबुरे यांचे पती जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून चिपळूण येथे कार्यरत होते. १९९६ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत सात वर्षीय प्रिती व पाच वर्षीय स्वाती या दोन मुलींवरही आभाळ कोसळले. त्यातून सावरून सीमा यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी प्रिती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर २०१९ आॅगस्टमध्ये तीन मजली वाडाच पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाल्याने पुन्हा दुसरा घाला नियतीने घातला. पुन्हा आपले घर होत नाही. या चिंतेने मायलेकींनी धास्ती घेतली होती; मात्र त्यातून सावरण्यासाठी मंगळवार पेठेतील अनेक मंडळे व तालीम संस्था मदतीसाठी दत्त म्हणून पुन्हा उभ्या राहत आहेत. पुन्हा तीन खोल्यांचे घर लवकरच उभे राहणार आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर