शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:26 IST

पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देकबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीलामंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळे मदतीला; पायाभरणी

कोल्हापूर : पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेच्या परिसरात कबुरे यांचा दगडी वाडा दिमाखात उभा होता. तीन मजली इमारत या कुटुंबीयांची शान होती. तब्बल आठ खोल्या असलेला हा वाडा ८ दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने जमीनदोस्त झाला. शुक्रवार पेठेतील हे कुटुंब बेघर झाले. यात सरकारी पंचनामे झाले. अत्यल्प अनुदानही मिळाले.यासोबतच धनंजय महाडिक युवाशक्तीने संसार सेट, तर प्रायव्हेट हायस्कूलच्या एका गु्रपने धनादेश देत मदत दिली. तरीही हे घर उभारणे अशक्य होते; त्यासाठी पुन्हा धाऊन आली कोल्हापूरकरांची माणुसकी. यात मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निरीक्षण केले. त्यांनी कबुरे कुटुंबीयांना पहिली मदत देण्याचा निर्धार केला.

त्यानुसार पैशांची जुळवाजुळव करीत नऊ लाख रुपयांचे तीन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्धार केला. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करीत, घर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, राजू भोसले, रमेश पोवार, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.कबुरे कुटुंबीय पुन्हा सावरणारसीमा कबुरे यांचे पती जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून चिपळूण येथे कार्यरत होते. १९९६ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत सात वर्षीय प्रिती व पाच वर्षीय स्वाती या दोन मुलींवरही आभाळ कोसळले. त्यातून सावरून सीमा यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी प्रिती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर २०१९ आॅगस्टमध्ये तीन मजली वाडाच पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाल्याने पुन्हा दुसरा घाला नियतीने घातला. पुन्हा आपले घर होत नाही. या चिंतेने मायलेकींनी धास्ती घेतली होती; मात्र त्यातून सावरण्यासाठी मंगळवार पेठेतील अनेक मंडळे व तालीम संस्था मदतीसाठी दत्त म्हणून पुन्हा उभ्या राहत आहेत. पुन्हा तीन खोल्यांचे घर लवकरच उभे राहणार आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर