शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

कबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:26 IST

पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देकबुरे कुटुंबीयांचे घर पुन्हा उभारणार, मंडळे धावली मदतीलामंगळवार पेठेतील तालीम संस्था, मंडळे मदतीला; पायाभरणी

कोल्हापूर : पुरात घर कोसळलेल्या कबुरे कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोल्हापुरातील तालीम संस्था व दानशूर व्यक्ती धावल्या आहेत. यात त्यांचे घर पुन्हा बांधून देण्यासाठी मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेच्या परिसरात कबुरे यांचा दगडी वाडा दिमाखात उभा होता. तीन मजली इमारत या कुटुंबीयांची शान होती. तब्बल आठ खोल्या असलेला हा वाडा ८ दिवस पुराच्या पाण्यात राहिल्याने जमीनदोस्त झाला. शुक्रवार पेठेतील हे कुटुंब बेघर झाले. यात सरकारी पंचनामे झाले. अत्यल्प अनुदानही मिळाले.यासोबतच धनंजय महाडिक युवाशक्तीने संसार सेट, तर प्रायव्हेट हायस्कूलच्या एका गु्रपने धनादेश देत मदत दिली. तरीही हे घर उभारणे अशक्य होते; त्यासाठी पुन्हा धाऊन आली कोल्हापूरकरांची माणुसकी. यात मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वैयक्तिक निरीक्षण केले. त्यांनी कबुरे कुटुंबीयांना पहिली मदत देण्याचा निर्धार केला.

त्यानुसार पैशांची जुळवाजुळव करीत नऊ लाख रुपयांचे तीन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्धार केला. त्यानुसार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी करीत, घर बांधणीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष निवासराव साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, राजू भोसले, रमेश पोवार, संभाजी जगदाळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.कबुरे कुटुंबीय पुन्हा सावरणारसीमा कबुरे यांचे पती जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून चिपळूण येथे कार्यरत होते. १९९६ दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत सात वर्षीय प्रिती व पाच वर्षीय स्वाती या दोन मुलींवरही आभाळ कोसळले. त्यातून सावरून सीमा यांनी मुलींना उच्चशिक्षित केले. मोठी मुलगी प्रिती हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर २०१९ आॅगस्टमध्ये तीन मजली वाडाच पुराच्या पाण्यात जमीनदोस्त झाल्याने पुन्हा दुसरा घाला नियतीने घातला. पुन्हा आपले घर होत नाही. या चिंतेने मायलेकींनी धास्ती घेतली होती; मात्र त्यातून सावरण्यासाठी मंगळवार पेठेतील अनेक मंडळे व तालीम संस्था मदतीसाठी दत्त म्हणून पुन्हा उभ्या राहत आहेत. पुन्हा तीन खोल्यांचे घर लवकरच उभे राहणार आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर