शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

शाहूंच्या स्मारकासाठी आंदोलनाचाच पर्याय

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

श्रीमंत शाहू महाराज : घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात असल्याबद्दल खंत

कोल्हापूर : शाहू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या बाबतीत कोणी अडथळे आणत असेल, तर त्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दांत श्रीमंत शाहू महाराज यांनी शुक्रवारी राज्य सरकारला इशारा दिला. शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी देशाच्या प्रगतीला दिशा दिली ते शाहू महाराज घरचेच आहेत, असे समजून त्यांच्याकडे कमी लक्ष दिले जात आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या कामाचा प्रारंभ शुक्रवारी दुपारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री हसन मुश्रीफ होते. शाहू महाराजांची उत्तर प्रदेशात भव्य स्मारके होतात, पण महाराष्ट्रात मात्र शाहू महाराज घरचेच असल्याचे समजून कमी महत्त्व दिले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला परंतु राज्यात सत्तांतर झाल्यापासून या स्मारकाबाबतीत काहीच हालचाली होत नाहीत, असा आक्षेपही त्यांनी यावेळी नोंदविला. शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वांनाच मान्य आहेत. त्यांच्या विचारांना कोणाचा विरोध असायचे कारण नाही, परंतु त्यांचे हे विचार कृतीतून किती जोमाने पुढे नेले जाईल हे पुढील काळात पाहावे लागेल तसेच आतापर्यंत शाहूंचे विचार ऐकत आलो परंतु गेल्या शंभर वर्षांत त्यांच्या विचाराने प्रगती किती झाली, याचे आत्मचिंतनही करण्याची गरज आहे, असे शाहू महाराज म्हणाले. सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांत टोल आणि एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सत्ता येऊन आठ महिने झाली तरीही टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार राजेक्ष क्षीरसागर यांना विधानसभेच्या दारासमोर उभे राहून आंदोलन करावे लागत आहे. जर आश्वासन पूर्ण केले जात नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. यावेळी महापौर वैशाली डकरे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचीही भाषणे झाली. नगरसेवक महेश कदम व शशिकांत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर स्थायी सभापती आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले.यावेळी उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव, गटनेते राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, प्रकाश गवंडी, मधुकर रामाणे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)शिवसेना-भाजपची उडविली खिल्लीशिवसेना-भाजपचे स्थानिक नेते एकमेकांवर करत असलेल्या टीकेची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अक्षरश: खिल्ली उडविली. टीकेचे संदर्भ देत मुश्रीफ यांनी सत्तेतील ही मंडळी अशी एकमेकांवर टीका करत असतील तर जनतेने कोणाकडे पाहावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनपाची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढा. कोणाची ताकद किती आहे, हे कोल्हापूरच्या जनतेला एकदा कळू दे, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.