शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

राज्यातील ४९ साखर कारखान्यांची धुराडी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 12:08 IST

sugerfactory, kolhapurnews राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४९ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अद्याप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसले तरी १९ लाख टन उसाचे गाळप होऊन ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

ठळक मुद्दे १९ लाख टन उसाचे गाळप १३१ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४९ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अद्याप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसले तरी १९ लाख टन उसाचे गाळप होऊन ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.यंदा राज्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने साखर कारखान्यांचे हंगाम लांबणीवर पडला. अद्याप शिवारात पाणी असल्याने ऊसतोड चालत नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम दबकतच सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४९ कारखाने सुरू झाले असून १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

सरासरी ६.९३ टक्के साखर उतारा राखत ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा शेतकरी संघटनाही ऊसदराचा मुद्दा फार ताणण्याची शक्यता कमी आहे. एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार आहेत. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांशी कारखाने सुरू होणार असून १५ नोव्हेंबरनंतर हंगामास गती येणार आहे. दरम्यान, मागील हंगामातील चौदा कारखान्यांकडे ८५ कोटी ५० लाख एफआरपीची रक्कम थकीत आहे. १३१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे.कर्नाटकात हंगामाला गतीकर्नाटकात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन गती घेतली आहे. विशेषकरून सीमाभागातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कारखानदार उसाची पळवापळवीबाबत चिंतेत आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर