शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

राज्यातील ४९ साखर कारखान्यांची धुराडी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 12:08 IST

sugerfactory, kolhapurnews राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४९ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अद्याप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसले तरी १९ लाख टन उसाचे गाळप होऊन ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

ठळक मुद्दे १९ लाख टन उसाचे गाळप १३१ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत ४९ कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. अद्याप कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसले तरी १९ लाख टन उसाचे गाळप होऊन ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.यंदा राज्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने साखर कारखान्यांचे हंगाम लांबणीवर पडला. अद्याप शिवारात पाणी असल्याने ऊसतोड चालत नाही. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम दबकतच सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४९ कारखाने सुरू झाले असून १९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

सरासरी ६.९३ टक्के साखर उतारा राखत ११.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा शेतकरी संघटनाही ऊसदराचा मुद्दा फार ताणण्याची शक्यता कमी आहे. एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदार तयार आहेत. त्यामुळे आठ दिवसांत बहुतांशी कारखाने सुरू होणार असून १५ नोव्हेंबरनंतर हंगामास गती येणार आहे. दरम्यान, मागील हंगामातील चौदा कारखान्यांकडे ८५ कोटी ५० लाख एफआरपीची रक्कम थकीत आहे. १३१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे.कर्नाटकात हंगामाला गतीकर्नाटकात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन गती घेतली आहे. विशेषकरून सीमाभागातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कारखानदार उसाची पळवापळवीबाबत चिंतेत आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर