शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मुलांनी अवांतर वाचन करावे

By admin | Updated: November 30, 2014 23:59 IST

नीलम माणगावे : मजले येथे बालसाहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; ग्रंथदिंडीचे आकर्षण

आळते : संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालसाहित्य प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात अशी संमेलने वरचेवर भरवली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत मुलांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले.मजले (ता. हातकणंगले) येथे आयोजित पहिल्या बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात माणगावे बोलत होत्या. तत्पूर्वी रजनी हिरळीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगावे म्हणाल्या, मुलांना घडविण्यात पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. घराघरांत टी.व्ही.बरोबर पुस्तकेही दिसली पाहिजेत. लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकतात. मुलांमध्ये क्षमता असते. मात्र, त्यांना योग्यवेळी दिशा मिळणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांना संस्कार स्वरूपातील पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.हिरळीकर म्हणाल्या, बालसाहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा शोध घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अभ्यासक्रमासोबत शिक्षकांनी मुलांना अन्य वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.स्वागताध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, साहित्य संमेलने वेगवेगळ्या प्रकारची होत असतात. परंतु, यामध्ये बालसाहित्यिकांना संधी दुर्मीळ असते. हा हेतू समोर ठेवून बालसाहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. मजलेसारख्या डोंगरी भागात पहिले संमेलन भरविले. त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे प्रत्येक वर्षी संमेलन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली. यामध्ये ग्रंथप्रेमींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोक घारगे यांच्या हस्ते डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. अविनाश पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, उपसरपंच छाया कोठावळे, सुमन पाटील, अमित पाटील, आदी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात ‘आपण हे वाचलेच पाहिजे!’ हा परिसंवाद झाला. कथाकथन, काव्यसंमेलन झाले. रोहिणी मोहिते, अंजली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)