शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मुलांनी अवांतर वाचन करावे

By admin | Updated: November 30, 2014 23:59 IST

नीलम माणगावे : मजले येथे बालसाहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; ग्रंथदिंडीचे आकर्षण

आळते : संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालसाहित्य प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात अशी संमेलने वरचेवर भरवली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत मुलांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले.मजले (ता. हातकणंगले) येथे आयोजित पहिल्या बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात माणगावे बोलत होत्या. तत्पूर्वी रजनी हिरळीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगावे म्हणाल्या, मुलांना घडविण्यात पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. घराघरांत टी.व्ही.बरोबर पुस्तकेही दिसली पाहिजेत. लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकतात. मुलांमध्ये क्षमता असते. मात्र, त्यांना योग्यवेळी दिशा मिळणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांना संस्कार स्वरूपातील पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.हिरळीकर म्हणाल्या, बालसाहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा शोध घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अभ्यासक्रमासोबत शिक्षकांनी मुलांना अन्य वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.स्वागताध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, साहित्य संमेलने वेगवेगळ्या प्रकारची होत असतात. परंतु, यामध्ये बालसाहित्यिकांना संधी दुर्मीळ असते. हा हेतू समोर ठेवून बालसाहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. मजलेसारख्या डोंगरी भागात पहिले संमेलन भरविले. त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे प्रत्येक वर्षी संमेलन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली. यामध्ये ग्रंथप्रेमींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोक घारगे यांच्या हस्ते डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. अविनाश पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, उपसरपंच छाया कोठावळे, सुमन पाटील, अमित पाटील, आदी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात ‘आपण हे वाचलेच पाहिजे!’ हा परिसंवाद झाला. कथाकथन, काव्यसंमेलन झाले. रोहिणी मोहिते, अंजली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)