शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अंगणवाडीतील मुलांना हवे शैक्षणिक साहित्य

By admin | Updated: July 21, 2014 00:26 IST

हजारो गरजू मुले वंचित

कृष्णा सावंत -पेरणोलीकोल्हापूर जिल्ह्यातील महिला बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामध्ये दोन वर्षांपासून शैक्षणिक साहित्याचा पुरवठा न झाल्याने हजारो गरजू मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत.२०१० मध्ये झालेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेपासून एकही मुलं वंचित राहू नये. त्याचबरोबर गळती राहू नये व मुलांना वयाच्या तीन वर्षांपासूनच शाळेची आवड निर्माण व्हावी. समाजातील सर्वच दुर्लक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणावे या उद्देशाने १० ते १५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करून अंगणवाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने गावागावांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. मुलांमध्ये शाळेची आवड व रुची निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी पाटी, चित्रकला पुस्तिका, रंगीत खडू, गणवेश, आदी शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा केला जातो. २०१०-११ पर्यंत सर्वच वर्गांतील मुलांना साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून साहित्यांचे वाटप न करण्यात आल्याने विशेषत: गरीब पालकांमधून जिल्हा परिषदेच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दरवर्षी देण्यात येतो. मात्र, जुलै महिना संपत आला तरी अद्याप गणवेश, पाटी, रंगीत खडू, चित्रकला पुस्तिका, आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आलेले नाही. २०१०-११ मध्ये एकदाच खुल्या वर्गातील मुलांना शालेय गणवेश देण्यात आला. त्यानंतर गणवेश वाटप करण्यात आलेले नाही.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शाळेऐवजी बाह्य कामकाजात गुंतवून ठेवण्यात आले आहे. शासनाकडून येणाऱ्या साहित्यांमधून घराकडूनच मुलांना खाऊ तयार करून आणावा लागतो. शासनाकडून तुटपुंजी अवांतर खर्चाची रक्कम मिळते. त्यामुळे स्वखर्चातूनच पीठाच्या गिरणीचा खर्च, गॅस, रॉकेलचा खर्च काहीवेळा करावा लागतो. त्यात कार्यालयातील बैठका त्यामुळे मुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते.जिल्ह्यातील अनेक गावांत दोन अंगणवाड्या एकाच वर्गात बसविल्या जातात. आजरा तालुक्यातील खेडे, पेरणोली, वझरे, कुसळवाडी, आदी बहुसंख्य गावात एकाच वर्गात दोन अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. सध्या फेडरेशनच्यावतीने लाफसी व खिचडी, सोजी करण्यासाठी गहू दिला जातो. गहू भरडून सोजी तयार करण्यामध्ये सेविकांचा वेळ वाया जातो. त्याशिवाय दिलेला गहू व तयार केलेल्या सोजीमधील वजनामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे गहूऐवजी सोजी द्या, अशी मागणी पालकांमधून होत आहे.