शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:24 IST

कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देअनाथ भावंडं : आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले. त्या घटनेत झालेल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करण लहानग्या भावंडांच्या बावरलेल्या आणि पाणावलेल्या नजरा मोठ्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. पालक नसले तरी मुलं मोठी होतातच, पण प्रश्न आहे तो अचानक आई-वडिलांच्या हरवलेल्या छत्रछायेचा आणि मनावर कायमस्वरूपी उठलेल्या ओरखड्यांचा. आता या मुलांचे पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला सतावत राहतो.

शुक्रवार पेठेतील जैन मठासमोरील बोळात राहत असलेले चांदी व्यावसायिक सुभाष कुंभार यांनी पत्नीचा खून करून आत्महत्या केली. त्यामागे कारण कोणतेही असले तरी या क्षणिक रागाने दोन निरागस भावंडांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. आई-वडिलांच्या निधनाचे दु:ख, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा, तुला कधी कळलं आई-वडील सारखे भांडायचे का? तुला काही बोलले होते का? असे पोलिसांसह परिसरातील नागरिक, नातेवाइकांचे प्रश्न आणि भेटायला येणाºयांच्या सहानुभूतीने हळहळणाºया नजरांचा सामना करणाºया निरागस नजराही न बोलता खूप काही बोलून जातात. या घटनेनंतर त्यांच्या घराला कुलूप असून, दोन्ही मुलं काकांच्या घरी आहेत.

सुभाष कुंभार यांना तीन मोठे भाऊ असून, ते तिघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. विटा तयार करणे, हा त्यांचा मूळ व्यवसाय. मात्र, शेजारी राहणाºया चांदी कारागिरांमुळे त्यांनीही व्यवसाय बदलला आणि चारही भावांनी चांदी व्यवसायात जम बसविला. सुभाष कुंभार तेवढे जैन गल्लीत राहायचे. मोठा मुलगा करण हा विवेकानंद शाळेत इयत्ता सातवीत, तर लहान करण हा खर्डेकर शाळेत पाचवीत शिकतो. लहान दीर आणि जावेच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या काकींनी ‘आता आम्ही सगळे मिळून मुलांचा सांभाळ करू,’ तर काकांनी, ‘बघू, आमच्यात चर्चा होऊन मुलांचे काय करायचे ते ठरवू,’ असे सांगितले.

पालकांनी टाकून दिलेली अगदी एक दिवसाची, अनाथपण वाट्याला आलेली मुलंही मोठी होतात. कोणत्या ना कोणत्या नातेवाइकांकडून, संस्थांकडून त्यांचा सांभाळ केला जातो. प्रश्न राहतो तो अशा दुर्दैवी घटनांमुळे अचानक आई-वडिलांचे प्रेम, माया, आईची उबदार कूस आणि वडिलांची आदरयुक्त भीती, लाडिक हट्ट, घेतली जाणारी काळजी या हरवलेल्या छायाछत्राचा आणि मनावर उठलेल्या ओरखड्यांचा.कोल्हापुरात आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकांच्या घरी असलेली गणेश आणि करण ही लहान भावंडे गुरुवारी अशी बावरलेली होती. काका-काकी, इतर भावंडं असली तरी आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. पालकांना आलेल्या क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार