शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:24 IST

कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देअनाथ भावंडं : आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले. त्या घटनेत झालेल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करण लहानग्या भावंडांच्या बावरलेल्या आणि पाणावलेल्या नजरा मोठ्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. पालक नसले तरी मुलं मोठी होतातच, पण प्रश्न आहे तो अचानक आई-वडिलांच्या हरवलेल्या छत्रछायेचा आणि मनावर कायमस्वरूपी उठलेल्या ओरखड्यांचा. आता या मुलांचे पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला सतावत राहतो.

शुक्रवार पेठेतील जैन मठासमोरील बोळात राहत असलेले चांदी व्यावसायिक सुभाष कुंभार यांनी पत्नीचा खून करून आत्महत्या केली. त्यामागे कारण कोणतेही असले तरी या क्षणिक रागाने दोन निरागस भावंडांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. आई-वडिलांच्या निधनाचे दु:ख, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा, तुला कधी कळलं आई-वडील सारखे भांडायचे का? तुला काही बोलले होते का? असे पोलिसांसह परिसरातील नागरिक, नातेवाइकांचे प्रश्न आणि भेटायला येणाºयांच्या सहानुभूतीने हळहळणाºया नजरांचा सामना करणाºया निरागस नजराही न बोलता खूप काही बोलून जातात. या घटनेनंतर त्यांच्या घराला कुलूप असून, दोन्ही मुलं काकांच्या घरी आहेत.

सुभाष कुंभार यांना तीन मोठे भाऊ असून, ते तिघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. विटा तयार करणे, हा त्यांचा मूळ व्यवसाय. मात्र, शेजारी राहणाºया चांदी कारागिरांमुळे त्यांनीही व्यवसाय बदलला आणि चारही भावांनी चांदी व्यवसायात जम बसविला. सुभाष कुंभार तेवढे जैन गल्लीत राहायचे. मोठा मुलगा करण हा विवेकानंद शाळेत इयत्ता सातवीत, तर लहान करण हा खर्डेकर शाळेत पाचवीत शिकतो. लहान दीर आणि जावेच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या काकींनी ‘आता आम्ही सगळे मिळून मुलांचा सांभाळ करू,’ तर काकांनी, ‘बघू, आमच्यात चर्चा होऊन मुलांचे काय करायचे ते ठरवू,’ असे सांगितले.

पालकांनी टाकून दिलेली अगदी एक दिवसाची, अनाथपण वाट्याला आलेली मुलंही मोठी होतात. कोणत्या ना कोणत्या नातेवाइकांकडून, संस्थांकडून त्यांचा सांभाळ केला जातो. प्रश्न राहतो तो अशा दुर्दैवी घटनांमुळे अचानक आई-वडिलांचे प्रेम, माया, आईची उबदार कूस आणि वडिलांची आदरयुक्त भीती, लाडिक हट्ट, घेतली जाणारी काळजी या हरवलेल्या छायाछत्राचा आणि मनावर उठलेल्या ओरखड्यांचा.कोल्हापुरात आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकांच्या घरी असलेली गणेश आणि करण ही लहान भावंडे गुरुवारी अशी बावरलेली होती. काका-काकी, इतर भावंडं असली तरी आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. पालकांना आलेल्या क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार