शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
3
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
4
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
5
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
6
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
7
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
8
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
9
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
10
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
11
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
12
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
13
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
14
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
15
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
16
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
17
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
18
तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा
19
अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?
20
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रावरील उपसाबंदीचे अग्निदिव्य पाणी गुरूवारी सोडणार : तारेवरची कसरत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:37 IST

दत्तात्रय पाटील।म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदी मध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या, ४२५ एमसीएफटी इतका पाणीसाठा असून, शेतीसह पिण्यासाठी दोन आणि जूनमध्ये केवळ पिण्यासाठी एक ...

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा करताना

दत्तात्रय पाटील।म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदीमध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या, ४२५ एमसीएफटी इतका पाणीसाठा असून, शेतीसह पिण्यासाठी दोन आणि जूनमध्ये केवळ पिण्यासाठी एक आणि पावसाने ओढ दिल्यास आणखी एक आवर्तन देण्याचे नियोजन आहे. मात्र, उद्या सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर पुढील पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा रोखण्याचे अग्निदिव्य पाटबंधारेसह वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना पार करावे लागणार आहे.

चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणात यंदा केवळ ९४० एमसीएफटी (६२%) इतका अल्प पाणीसाठा झाला. या अत्यल्प पाणीसाठ्यावर चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील शेतीसह नागरिक अवलंबून आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेतीसह पिण्यासाठी आठ आवर्तने देण्याचे नियोजन केले होते. मात्र, पहिल्या चार ते पाच आवर्तनापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने अंतिम टप्प्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या, चिकोत्रा खोºयात पाणीटंचाईचे ढग गडद होत आहेत.

धरणात उपलब्ध पाणी पाहता ७०० एकर बागायती क्षेत्र असणे आवश्यक असताना येथील शेतकºयांनी तब्बल सुमारे २१०० एकर इतक्या मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले. तसेच, नदीमध्ये पाणी साठ्यासाठी मोठमोठे खड्डे काढण्यात आले. तसेच, वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. परिणामी, नदीत सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी जादा वेळ लागत आहे. दरम्यान, १२ ते २१ एप्रिल या कालावधीत चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदीचा आदेश काढून पाटबंधारे विभागाने नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे....तर पुढील पाणी बरगे काढूनचउद्या, गुरूवारी सोडण्यात येणारे आवर्तन हे १२५ ते १३० एमसीएफटी पाण्यात पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी उपसाबंदी आदेशाचे पालन होण्यासाठी शेतकºयांसह नदीकाठावरील ग्रामपंचायत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे व वीजवितरण अधिकाºयांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हासह अवैध पाणी उपसामुळे या नदीवरील शेवटच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणार आहे. याचा थेट परिणाम पुढील आवर्तनावर होणार असून, पुढील पाणी सर्वच बंधाºयांचे बरगे काढून सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट निर्देश पाटबंधारेच्या अधिकाºयांनी दिले आहेत.आतातरी डोळे उघडणार काय ?चिकोत्रा खोऱ्यात पाणीटंचाईची जाणीव असणाºया आणि उपसाबंदीतही शेतीला पाणी देण्यासाठी बड्या शेतकºयांनी कमी पाणीपरवाना असताना जादा क्षमतेच्या विद्युतमोटारी, सिंगल फेजवर चालणाºया मोटारी बसवून पाणी उपसा केला. आता या क्लुप्त्याची माहिती प्रशासनापर्यंत आली आहे. त्यामुळे आता याबाबत ठोस पावले उचलून कारवाई होणार का? की ये रे माझ्या मागल्या.. हाच कित्ता अधिकाºयांकडून गिरवला जाणार, असा सवाल चिकोत्राच्या शेवटच्या टोकावरील गावकºयांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणwater transportजलवाहतूक