शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हालविणार

By admin | Updated: February 18, 2015 01:29 IST

डाव्या पक्षांचा इशारा : भव्य मोर्चाद्वारे पानसरे यांच्या हल्लेखोरास शोधण्याची मागणी

कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) व पत्नी उमा यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आणि त्यातील मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता शासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हलवील, असा इशारा मंगळवारी निघालेल्या निषेध मोर्चात देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बहुतांश वक्त्यांनी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडत कडव्या शब्दांत निषेध नोंदविला. हल्ल्याचा निषेध आणि हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी बारा वाजता उत्स्फूर्तपणे कष्टकरी, श्रमिक, फेरीवाले यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने बिंदू चौकात एकत्र आले. ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. आम्ही सारे पानसरे; रक्त हिरवं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं; पुरोगामित्वाचे आम्ही वारकरी; कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध असो; लढेंगे, जितेंगे, आदी आशयाचे फलक हातात घेऊन लक्ष वेधण्यात आले. गोडसेवाद, सावरकरवाद मुर्दाबाद, भगव्याचे राजकारण करणाऱ्यांचा मुर्दाबाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना (आर.एस.एस), पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्याचा आणि झाडायला लावणाऱ्यांचा मुर्दाबाद, माणसा, माणसा जागा हो - विवेकाचा धागा हो अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासबाग मैदान, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, उषा टॉकीज, बसंत-बहार या मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ज्येष्ठ सामाजिक नेते एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो म्हणाले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे मारेकरी सापडलेले नाहीत. भाजपचे सरकार ठेकेदारी आणि लूटमारीला प्रोत्साहन देत आहे. प्रा. पाटील म्हणाले, डॉ. दाभोळकरांचे मारेकरी दीड वर्षानंतरही सापडत नाहीत. यामुळेच पुरोगामी लोकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढते आहे. राज्यकर्त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही. ते भेकड प्रवृत्तीने आपली खुर्ची सांभाळण्यात मश्गुल आहेत. पानसरे अजातशत्रू आहेत. त्यांचे कोणाशीही वैर नाही. त्यांचे विचार न पचणाऱ्या प्रवृत्तीने डाव साधला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला दाभोळकर, तानाजी ठोंबरे, उदय नारकर, गिरीश फोंडे, अ‍ॅड. सुभाष लांडे (अहमदनगर) यांची भाषणे झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजीव आवळे, ‘संग्राम’ संस्थेच्या सचिव मीना शेषू, धनाजी गुरव, साहित्यिक राजन गवस, अतुल दिघे, चंद्रकांत जाधव, नामदेव गावडे, गणी आजरेकर, शिवाजीराव परुळेकर, आदी उपस्थित होते. अनेक व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, कांगो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जाणीवपूर्वक अफवा पानसरेंवर कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. हे खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नये. यात पानसरे यांचे विचार न पचणाऱ्या शक्तीचा हात आहे, असे कांगो यांनी सांगितले. ‘आरएसएस’ची खुमखुमी ‘भाकप’चे नगरसेवक आशपाक सलामी (औरंगाबाद) म्हणाले, भाजप जातिपातींमध्ये भांडण लावीत राजकारण करीत आहे. भाजपचे सरकार आल्याने ‘आरएसएस’ वाल्यांना चेव चढला आहे.