शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हालविणार

By admin | Updated: February 18, 2015 01:29 IST

डाव्या पक्षांचा इशारा : भव्य मोर्चाद्वारे पानसरे यांच्या हल्लेखोरास शोधण्याची मागणी

कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) व पत्नी उमा यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आणि त्यातील मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता शासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हलवील, असा इशारा मंगळवारी निघालेल्या निषेध मोर्चात देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बहुतांश वक्त्यांनी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडत कडव्या शब्दांत निषेध नोंदविला. हल्ल्याचा निषेध आणि हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी बारा वाजता उत्स्फूर्तपणे कष्टकरी, श्रमिक, फेरीवाले यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने बिंदू चौकात एकत्र आले. ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. आम्ही सारे पानसरे; रक्त हिरवं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं; पुरोगामित्वाचे आम्ही वारकरी; कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध असो; लढेंगे, जितेंगे, आदी आशयाचे फलक हातात घेऊन लक्ष वेधण्यात आले. गोडसेवाद, सावरकरवाद मुर्दाबाद, भगव्याचे राजकारण करणाऱ्यांचा मुर्दाबाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना (आर.एस.एस), पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्याचा आणि झाडायला लावणाऱ्यांचा मुर्दाबाद, माणसा, माणसा जागा हो - विवेकाचा धागा हो अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासबाग मैदान, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, उषा टॉकीज, बसंत-बहार या मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ज्येष्ठ सामाजिक नेते एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो म्हणाले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे मारेकरी सापडलेले नाहीत. भाजपचे सरकार ठेकेदारी आणि लूटमारीला प्रोत्साहन देत आहे. प्रा. पाटील म्हणाले, डॉ. दाभोळकरांचे मारेकरी दीड वर्षानंतरही सापडत नाहीत. यामुळेच पुरोगामी लोकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढते आहे. राज्यकर्त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही. ते भेकड प्रवृत्तीने आपली खुर्ची सांभाळण्यात मश्गुल आहेत. पानसरे अजातशत्रू आहेत. त्यांचे कोणाशीही वैर नाही. त्यांचे विचार न पचणाऱ्या प्रवृत्तीने डाव साधला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला दाभोळकर, तानाजी ठोंबरे, उदय नारकर, गिरीश फोंडे, अ‍ॅड. सुभाष लांडे (अहमदनगर) यांची भाषणे झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजीव आवळे, ‘संग्राम’ संस्थेच्या सचिव मीना शेषू, धनाजी गुरव, साहित्यिक राजन गवस, अतुल दिघे, चंद्रकांत जाधव, नामदेव गावडे, गणी आजरेकर, शिवाजीराव परुळेकर, आदी उपस्थित होते. अनेक व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, कांगो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जाणीवपूर्वक अफवा पानसरेंवर कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. हे खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नये. यात पानसरे यांचे विचार न पचणाऱ्या शक्तीचा हात आहे, असे कांगो यांनी सांगितले. ‘आरएसएस’ची खुमखुमी ‘भाकप’चे नगरसेवक आशपाक सलामी (औरंगाबाद) म्हणाले, भाजप जातिपातींमध्ये भांडण लावीत राजकारण करीत आहे. भाजपचे सरकार आल्याने ‘आरएसएस’ वाल्यांना चेव चढला आहे.