शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हालविणार

By admin | Updated: February 18, 2015 01:29 IST

डाव्या पक्षांचा इशारा : भव्य मोर्चाद्वारे पानसरे यांच्या हल्लेखोरास शोधण्याची मागणी

कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) व पत्नी उमा यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आणि त्यातील मुख्य सूत्रधाराला चार दिवसांत अटक करा, अन्यथा महाराष्ट्रातील जनता शासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन मुख्यमंत्र्यांचे सिंहासन हलवील, असा इशारा मंगळवारी निघालेल्या निषेध मोर्चात देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बहुतांश वक्त्यांनी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडत कडव्या शब्दांत निषेध नोंदविला. हल्ल्याचा निषेध आणि हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी बारा वाजता उत्स्फूर्तपणे कष्टकरी, श्रमिक, फेरीवाले यांसह विविध संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने बिंदू चौकात एकत्र आले. ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला. आम्ही सारे पानसरे; रक्त हिरवं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं; पुरोगामित्वाचे आम्ही वारकरी; कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध असो; लढेंगे, जितेंगे, आदी आशयाचे फलक हातात घेऊन लक्ष वेधण्यात आले. गोडसेवाद, सावरकरवाद मुर्दाबाद, भगव्याचे राजकारण करणाऱ्यांचा मुर्दाबाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना (आर.एस.एस), पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद, पानसरेंवर गोळ्या झाडणाऱ्याचा आणि झाडायला लावणाऱ्यांचा मुर्दाबाद, माणसा, माणसा जागा हो - विवेकाचा धागा हो अशा दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासबाग मैदान, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, उषा टॉकीज, बसंत-बहार या मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ज्येष्ठ सामाजिक नेते एन. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. ‘भाकप’चे नेते भालचंद्र कांगो म्हणाले, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचे मारेकरी सापडलेले नाहीत. भाजपचे सरकार ठेकेदारी आणि लूटमारीला प्रोत्साहन देत आहे. प्रा. पाटील म्हणाले, डॉ. दाभोळकरांचे मारेकरी दीड वर्षानंतरही सापडत नाहीत. यामुळेच पुरोगामी लोकांवर हल्ला करण्याचे धाडस वाढते आहे. राज्यकर्त्यांना भारतीय राज्यघटना मान्य नाही. ते भेकड प्रवृत्तीने आपली खुर्ची सांभाळण्यात मश्गुल आहेत. पानसरे अजातशत्रू आहेत. त्यांचे कोणाशीही वैर नाही. त्यांचे विचार न पचणाऱ्या प्रवृत्तीने डाव साधला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पत्नी शैला दाभोळकर, तानाजी ठोंबरे, उदय नारकर, गिरीश फोंडे, अ‍ॅड. सुभाष लांडे (अहमदनगर) यांची भाषणे झाली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजीव आवळे, ‘संग्राम’ संस्थेच्या सचिव मीना शेषू, धनाजी गुरव, साहित्यिक राजन गवस, अतुल दिघे, चंद्रकांत जाधव, नामदेव गावडे, गणी आजरेकर, शिवाजीराव परुळेकर, आदी उपस्थित होते. अनेक व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, कांगो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. जाणीवपूर्वक अफवा पानसरेंवर कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची अफवा जाणीवपूर्वक पसरविली जात आहे. हे खोटे आहे. यावर विश्वास ठेवू नये. यात पानसरे यांचे विचार न पचणाऱ्या शक्तीचा हात आहे, असे कांगो यांनी सांगितले. ‘आरएसएस’ची खुमखुमी ‘भाकप’चे नगरसेवक आशपाक सलामी (औरंगाबाद) म्हणाले, भाजप जातिपातींमध्ये भांडण लावीत राजकारण करीत आहे. भाजपचे सरकार आल्याने ‘आरएसएस’ वाल्यांना चेव चढला आहे.