शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

shiv bhojnalaya : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:07 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला शिवभोजन थाळी लाभार्थ्यांशी संवादकेवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी, आशीर्वाद घेण्याचे काम

कोल्हापूर : सर्वांना जय महाराष्ट्र ! दादा... समाधानी आहात का... शिवभोजन थाळी कशी आहे... योजना आवडली का... सरकार स्थापन होवून आज दोन महिने पूर्ण होत आहेत... केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे... हे सर्व आशीर्वाद घेण्याचे काम आहे, असा संवाद लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत  रंगला.

उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला.आण्णा रेस्टॉरंट येथे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला. याच ठिकाणी मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज वेब लिंकच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला.

भोजनाची गुणवत्ता, टापटिपपणा आणि स्वच्छता यांच्याशी अजिबात तडजोड नको, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आज सरकारला दोन महिने पूर्ण होत आहेत. केवळ घोषणा करून न थांबता ही योजना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. या योजनेचे शासनामध्ये मित्र पक्षानेही स्वागत केले आहे.रुद्राक्ष स्वयं महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली. मुख्यमंत्री म्हणाले, जमणार आहे ना हे काम तुम्हाला...आशीर्वाद घेण्याचे काम आहे...आपली संस्कृती आहे.. अन्नदाता सुखी भव म्हणण्याची. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी माहिती दिली.

प्रारंभ केल्यापासून या ठिकाणी 100 टक्के थाळ्या संपत आहेत. समोरच महापालिकेचे सावित्रीबाई फुले रूग्णालय असल्याने शिवभोजन योजनेचा खूप चांगला फायदा होत आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, योग्य त्या सुविधा दिल्या जातात का ते पहा आणि त्यांना सहकार्य करा. शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला होतोय यातच मला आनंद आहे. असे सांगून त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.सरकारचे वजन वाढले पाहिजे असं काम करा- मुख्यमंत्रीआण्णा रेस्टॉरंट येथे देण्यात येणाऱ्या पदार्थांचे, चपातीचे वजन हे जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पदार्थांचे वजन किती आहे हे माहीत नाही, पण सरकारचं वजन वाढलं पाहिजे, अशा पध्दतीने काम करा. यावेळी उपस्थितांनी त्याला दाद दिली.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, महिला बचत गटाच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे, स्म‍िता मुधाळे, प्रमिला केंगारे, लता कुंभार, मधुरा प्रभावळकर,गीता सोलापुरे, प्राची मंडलिक यांच्यासह लाभार्थी प्रकाश पाटील-सरूडकर, मंगल सतीश कासे, अभिजीत सरदेवलकर, कामिनी भाटे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयkolhapurकोल्हापूर