शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उद्धव हेच भ्रष्टाचाराला जबाबदार

By admin | Updated: February 17, 2017 23:44 IST

नारायण राणेंचा घणाघात : पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप का?

कुडाळ : उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा फेकाडा मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. माझ्या लोकप्रतिनिधींना चोर म्हणणाऱ्या या चोरांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच सेना-भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत, ते आमच्याशी काय लढणार? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी त्यांनी एकमेकांवर बोट दाखविणे थांबवावे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपो मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर प्रचार सभा झाली. या प्रचार सभेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश साळगावकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, राकेश कांदे, सुदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, अस्मिता बांदेकर, भाके वारंग, संदीप कदम, विशाल परब, काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच जिल्ह्यात येऊन माझ्यावरच बोलण्याची हिम्मत करू नये. लोक त्यांना जुमानणार नाहीत. रविंद्र चव्हाणांसारखे मंत्री आमच्याकडे यात्रेत फिरतात. नगरपालिकेसाठी जिल्'ात फिरलेल्या चव्हाणांना केवळ कुडाळात आणि सावंतवाडी एकच उमेदवार निवडून आणता. वस्त्रहरण त्यांनी बघावे की राणेंची सभा लागते तेव्हा खुर्च्या कमी पडतात. वस्त्रहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वस्त्रच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचे वस्त्रहरण कसे करणार, असा टोला त्यांनी युती सरकारला लगावला.मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या म्हणजे..नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आपण खुर्च्या मोजत नव्हतो; तर भाजपत गेलेल्यांची राजकीय लायकी जनतेला दाखवित होतो. पंतप्रधानांना आणून देखील भाजपचा विधानसभेत पराभव झाला.