शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा क्रांतिदिनी जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 10:57 IST

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला.

ठळक मुद्देमराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा क्रांतिदिनी जिल्हा बंदसुरेश पाटील यांचा इशारा, मराठा क्रांती संघटनेचा मेळावा

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला.ते मराठा क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या बेरोजगार युवक मेळाव्यात शिवाजी मंदिर येथे बोलत होते. जिल्हाध्यक्ष परेश भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली.सुरेश पाटील म्हणाले, गेली १५ वर्षे मराठा समाज आरक्षण मागत आहे. हा आरक्षणाचा लढा सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. राणे यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे, असे अहवालात सांगितले. परंतु, या प्रश्नी जनहित याचिका दाखल झाली; त्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.

२०१४ ला भाजप-शिवसेनेला मराठा समाजाने या प्रश्नी साथ दिली. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने मराठा आरक्षणाचे सात ते आठ जी. आर. काढले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा नऊ आॅगस्टला जिल्हा बंद करू, असा इशारा सुरेश पाटील यांनी यावेळी दिला.यावेळी माजी नगरसेवक रवी इंगवले म्हणाले, मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे; पण इतर समाजातील धर्मांवर व जातींवर अन्याय होणार नाही, याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे. याप्रसंगी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर झाली. शहराध्यक्ष म्हणून राहुल इंगवले यांची निवड झाली.मेळाव्यास भरत पाटील, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, अमोल कल्याणकर, सुनीता पाटील, नितीन पाटील, पुष्कर पाटील, निरंजन पाटील यांच्यासह युवक उपस्थित होते.मागण्या...

  1. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात व विनाअट कर्ज द्यावे.
  2. प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारण्यात यावे.
  3. बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार भत्ता वाढवून देण्यात यावा.

 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर