शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा क्रांतिदिनी जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 10:57 IST

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला.

ठळक मुद्देमराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा क्रांतिदिनी जिल्हा बंदसुरेश पाटील यांचा इशारा, मराठा क्रांती संघटनेचा मेळावा

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा या प्रश्नी क्रांतिदिनी नऊ आॅगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद करू, असा इशारा मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी कोल्हापुरात दिला.ते मराठा क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या बेरोजगार युवक मेळाव्यात शिवाजी मंदिर येथे बोलत होते. जिल्हाध्यक्ष परेश भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर झाली.सुरेश पाटील म्हणाले, गेली १५ वर्षे मराठा समाज आरक्षण मागत आहे. हा आरक्षणाचा लढा सुरू आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. राणे यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण द्यावे, असे अहवालात सांगितले. परंतु, या प्रश्नी जनहित याचिका दाखल झाली; त्यामुळे न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली.

२०१४ ला भाजप-शिवसेनेला मराठा समाजाने या प्रश्नी साथ दिली. सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने मराठा आरक्षणाचे सात ते आठ जी. आर. काढले; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि आरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर ३० जुलैपर्यंत बैठक लावावी, अन्यथा नऊ आॅगस्टला जिल्हा बंद करू, असा इशारा सुरेश पाटील यांनी यावेळी दिला.यावेळी माजी नगरसेवक रवी इंगवले म्हणाले, मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे; पण इतर समाजातील धर्मांवर व जातींवर अन्याय होणार नाही, याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे. याप्रसंगी मराठा क्रांती संघटनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर झाली. शहराध्यक्ष म्हणून राहुल इंगवले यांची निवड झाली.मेळाव्यास भरत पाटील, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर, संतोष कांदेकर, अमोल कल्याणकर, सुनीता पाटील, नितीन पाटील, पुष्कर पाटील, निरंजन पाटील यांच्यासह युवक उपस्थित होते.मागण्या...

  1. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात व विनाअट कर्ज द्यावे.
  2. प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारण्यात यावे.
  3. बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार भत्ता वाढवून देण्यात यावा.

 

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर