शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

टोलमुक्ती संदेशाने मुख्यमंत्री हैराण

By admin | Updated: November 27, 2014 00:50 IST

बॅटरी होतेये डिस्चार्ज : कोल्हापूरकरांचा नाद खुळा

कोल्हापूर : आजवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून टोलमुक्तीसाठी लढा देणाऱ्या कोल्हापूरकरांनी आज, बुधवारी आंदोलनाचा अनोखा फंडा वापरला़ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिस्ड कॉल आणि एसएमएस करून टोलमुक्तीचे गाऱ्हाणे मांडले़ कोल्हापूरकरांच्या या नाद खुळ्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली नाही तरच नवल!रविवार पेठेत लागलेल्या एका अनोख्या बॅनरने अख्ख्या शहराचे आणि मीडियाचेही लक्ष वेधले़ ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो,’ असा फलक बिंदू चौकात लावण्यात आला होता़ त्याखाली मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता़ मग काय, दिसेल त्याने आपल्या मोबाईलवरून थेट मुख्यमंत्र्यांनाच ‘रिंग’ दिली़ तर अनेकांनी एसएमएस पाठवून टोलमुक्त करण्याची मागणी केली़ मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही मोबाईल घेतला नाही. ‘लोकमत’नेही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यावेळी मोबाईल स्वीच आॅफ असल्याचे आढळून आले़ एकीकडे रंगणारा खडसे-ठाकरे वाद अन् दुसरीकडे शिवसेनेच्या सत्तासहभागाबाबत दिल्लीकडे लागलेले मुख्यमंत्र्यांचे लक्ष... अशा स्थितीत कधी काय ‘मेसेज’ येईल, याबाबत सतर्क असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा दिवस गाजवला तो कोल्हापूरकरांनी! या उपक्रमाबद्दल बोलताना संयोजक महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. हा एक टप्पा असून, यासाठी आम्ही यावेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध ‘व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एसएमएस तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत. (प्रतिनिधी) हजारो एसएमएसदिवसभर येणाऱ्या हजारो एसएमएसमुळे त्यांच्या मोबाईलची ‘बॅटरी’ डिस्चार्ज झाली असावी़ खरे तर मुख्यमंत्री आज दिवसभर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत होते़ त्यामुळे काही काळ त्यांचा मोबाईल बंदच होता़