शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : नाना पटोले यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:10 IST

कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनोटाबंदी मुळे काळा पैसा बाहेर आलाच नाहीचांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातराजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणार

कोल्हापूर ,दि.  ०६ :  कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरात एका कार्यक्रमानिमित्त खासदार नाना पटोले आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येकाला मंत्री करणार असे सांगतात, नारायण राणे यांनाही ते असेच सांगत आहे. त्याचबरोबर सरकारचे अनेक निर्णय स्वत: चंद्रकांत दादाच घेत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील हे समजत नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य कर्जबाजारी करायचे का? असे वक्तव्य केले होते. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारने तीन वर्षात चांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? असा खोचक सवालही खासदार पटोले यांनी उपस्थित केला.

लोकांची अपेक्षापूर्ती झाली नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे सांगून सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खुर्चीवर बसण्यापूर्वी व खूचीवर बसल्यावर नेत्यांच्या भूमिका बदलतात,असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासिनआहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रात होतआहेत. किटकनाशकामुळे शेतकरी जीवाला मुकत आहेत. यवतमाळ जिल्हा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सरते शेवटी यवतमाळला आले. असे पटोले यांनी सांगितले.

कर्ज, बोगस किटकनाशके, नकली बियाणे संदर्भात लोकसभेने संयुक्त समितीनियुक्ती करावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आपण भेट घेत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीच्या कारभाराबद्दललोकप्रतिनिधींनी बोललेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारुसंदर्भात केलेल्या वक्तव्याचाही पटोले यांनी निषेध केला.

कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली चुकीची कबुलीराज्यसरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरुन घेणे, आॅनलाईनअर्ज दाखल करणे यागोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहे, अशी टीका आपण केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना चुका झाल्याची कबुली दिली. असे पटोले यांनी सांगितले.

खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातनोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी वजीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.

राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणारशेतकऱ्यांच्या हितासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे सांगून भाजपचा नारा सात बारा कोरा, झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील