शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : नाना पटोले यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:10 IST

कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनोटाबंदी मुळे काळा पैसा बाहेर आलाच नाहीचांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातराजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणार

कोल्हापूर ,दि.  ०६ :  कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरात एका कार्यक्रमानिमित्त खासदार नाना पटोले आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येकाला मंत्री करणार असे सांगतात, नारायण राणे यांनाही ते असेच सांगत आहे. त्याचबरोबर सरकारचे अनेक निर्णय स्वत: चंद्रकांत दादाच घेत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील हे समजत नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य कर्जबाजारी करायचे का? असे वक्तव्य केले होते. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारने तीन वर्षात चांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? असा खोचक सवालही खासदार पटोले यांनी उपस्थित केला.

लोकांची अपेक्षापूर्ती झाली नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे सांगून सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खुर्चीवर बसण्यापूर्वी व खूचीवर बसल्यावर नेत्यांच्या भूमिका बदलतात,असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासिनआहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रात होतआहेत. किटकनाशकामुळे शेतकरी जीवाला मुकत आहेत. यवतमाळ जिल्हा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सरते शेवटी यवतमाळला आले. असे पटोले यांनी सांगितले.

कर्ज, बोगस किटकनाशके, नकली बियाणे संदर्भात लोकसभेने संयुक्त समितीनियुक्ती करावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आपण भेट घेत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीच्या कारभाराबद्दललोकप्रतिनिधींनी बोललेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारुसंदर्भात केलेल्या वक्तव्याचाही पटोले यांनी निषेध केला.

कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली चुकीची कबुलीराज्यसरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरुन घेणे, आॅनलाईनअर्ज दाखल करणे यागोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहे, अशी टीका आपण केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना चुका झाल्याची कबुली दिली. असे पटोले यांनी सांगितले.

खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातनोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी वजीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.

राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणारशेतकऱ्यांच्या हितासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे सांगून भाजपचा नारा सात बारा कोरा, झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील