शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : नाना पटोले यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:10 IST

कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनोटाबंदी मुळे काळा पैसा बाहेर आलाच नाहीचांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातराजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणार

कोल्हापूर ,दि.  ०६ :  कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरात एका कार्यक्रमानिमित्त खासदार नाना पटोले आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येकाला मंत्री करणार असे सांगतात, नारायण राणे यांनाही ते असेच सांगत आहे. त्याचबरोबर सरकारचे अनेक निर्णय स्वत: चंद्रकांत दादाच घेत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील हे समजत नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य कर्जबाजारी करायचे का? असे वक्तव्य केले होते. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारने तीन वर्षात चांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? असा खोचक सवालही खासदार पटोले यांनी उपस्थित केला.

लोकांची अपेक्षापूर्ती झाली नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे सांगून सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खुर्चीवर बसण्यापूर्वी व खूचीवर बसल्यावर नेत्यांच्या भूमिका बदलतात,असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासिनआहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रात होतआहेत. किटकनाशकामुळे शेतकरी जीवाला मुकत आहेत. यवतमाळ जिल्हा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सरते शेवटी यवतमाळला आले. असे पटोले यांनी सांगितले.

कर्ज, बोगस किटकनाशके, नकली बियाणे संदर्भात लोकसभेने संयुक्त समितीनियुक्ती करावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आपण भेट घेत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीच्या कारभाराबद्दललोकप्रतिनिधींनी बोललेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारुसंदर्भात केलेल्या वक्तव्याचाही पटोले यांनी निषेध केला.

कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली चुकीची कबुलीराज्यसरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरुन घेणे, आॅनलाईनअर्ज दाखल करणे यागोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहे, अशी टीका आपण केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना चुका झाल्याची कबुली दिली. असे पटोले यांनी सांगितले.

खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातनोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी वजीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.

राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणारशेतकऱ्यांच्या हितासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे सांगून भाजपचा नारा सात बारा कोरा, झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील