शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस पाचवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:10 IST

तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये पन्हाळ्यावर सपत्नीक आले होते

संदीप आडनाईक

कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण   यांच्यानंतर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तब्बल ५० वर्षांनंतर पन्हाळगडावर आलेले देवेंद्र फडणवीस हे पाचवे मुख्यमंत्री आहेत.पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेची स्थापना १९५४ मध्ये झाली. त्यानंतर पन्हाळ्याच्या मोरोपंत ग्रंथालयाची स्थापना ५ मे १९५९ रोजी झाली. त्यानंतर याच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९६२ मध्ये पन्हाळ्यावर सपत्नीक आले होते. त्यानंतर १९६३मध्ये तत्कालीन मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार पन्हाळ्यावर आले होते. ६ जून १९७४ रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला तीनशे वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पन्हाळगडावर हा त्रिशत संवत्सरी सोहळा पार पडला होता. छत्रपतींच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती पन्हाळा नगरपालिकेने तेव्हा उभारली होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पन्हाळ्यावरील पुतळ्याचे अनावरण समारंभासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९७६ मध्ये आले होते.

या आठवणी पन्हाळ्याचे ज्येष्ठ नागरिक संभाजी गायकवाड यांनी सांगितली. त्यानंतर आता तब्बल ५० वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पन्हाळगडावर आलेले पाचवे मुख्यमंत्री ठरले आहेत.पन्हाळ्यावर अनेक दिग्गज राजकीय नेते विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येऊन गेले आहेत. यामध्ये नंतर मुख्यमंत्रिपदावर राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोहर जोशी, बॅ. ए. आर. अंतुले, वसंतदादा पाटील, लोकसभेचे सभापती शिवराज पाटील-चाकूरकर, गोव्याचे तात्कालीन मुख्यमंत्री श्रीपाद नाईक, शशीकला काकोडकर, मनोहर पर्रीकर यांच्यासह देशातील तसेच राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस