शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

छत्रपतींचे वंशज हे फक्त मालमत्तेचेच वारसदार : ज्ञानेश महाराव

By admin | Updated: March 13, 2017 14:50 IST

श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा : मराठ्यांची चळवळ संपविण्याचे काम :नीतेश राणे

छत्रपतींचे वंशज हे फक्त मालमत्तेचेच वारसदार : ज्ञानेश महाराव

श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा : मराठ्यांची चळवळ संपविण्याचे काम : नीतेश राणे

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे आताचे वंशज हे फक्त त्यांच्या मालमत्तेचेच वारसदार आहेत. यातील एकजण कॉलर उडवितो तर दुसरा खासदारकीसाठी आपले इमान व विचार विसरतो, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी रविवारी येते खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता टीकेची झोड उठविली.याच कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनी मराठा नेत्यांची महामंडळे, खासदार, आमदार अशा पदांवर वर्णी लावून मराठा आरक्षणाची चळवळ संपविण्याचे काम सुरु आहे, अशी टीका केली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत लिखित ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’, ‘श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात सोमवारी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, वैभवराजे भोसले, उद्योजक चंद्रकांत जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. नीतेश राणे व राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले. महाराव यांनी जो कधी शाहीर झाला नाही तो शिवशाहीर आणि खरा इतिहास ज्याने कधी लिहिला नाही त्याला ‘महाराष्ट्र भूषण’ अशा शब्दात शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. खरे शिवाजी महाराज समजायचे असतील तर प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले पाहीजेत, त्यानंतर राजर्षी शाहू महाराज व त्यानंतर महात्मा फुले समजून घेतले पाहिजेत. महाराव म्हणाले, माणूस नुसता विचारवंत असून चालणार नाही तर तो कृतिशील असला पाहीजे. त्यांच्या कृतीवर इतरांनी डॉक्टरेट मिळविली पाहीजे. ज्याची किंमत चुकवायची तयारी आहे त्यालाच शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा अधिकार आहे. नीतेश राणे म्हणाले, इतिहासाबद्दल छेडछाड केली जात असल्याने आताच्या पिढीसमोर दोन प्रकारचे इतिहास येत आहेत. त्यामुळे यातील खरा इतिहास कोणता याबाबत संभ्रम आहे. शिवाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास मांडण्याचा खेळ मांडला जात असून ते रोखण्याची गरज आहे. मराठा मोर्चातील एक तरी मागणी या सरकारने पूर्ण केली का? हे तपासून त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असून आहेत. कदाचित त्यांना पारदर्शकपणे फाशी दिली असेल. कारण आता पारदर्शकतेचा जमाना आहे. राजेंद्र कोंढरे म्हणाले, कोल्हापूरच्या कर्मभूमीतील इतिहास संशोधकांनी आपले आयुष्य खर्च करुन योग्य इतिहास समोर आणण्याचे काम केले आहे. ते मौल्यवान असून त्यांचा सर्वांनी मानसन्मान राखण्याची गरज आहे. इंद्रजीत सावंत यांनी पुस्तकाविषयी माहिती देताना ‘भोसले कुलाचा वंशवृक्ष’मध्ये नारायणापासून शाहूंपर्यंत १६१ व्यक्तींचा समावेश आहे तर शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी, जिजाऊ आदींच्या १४० मुद्रांचा समावेश आहे. ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ मध्ये खोटा इतिहास खोडून काढण्याचे काम केले आहे. देविकाराणी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिन तोडकर यांनी आभार मानले.

५०० पुस्तके वाटणार

इंद्रजीत सावंत यांनी लिखित ५०० पुस्तके खरेदी करुन ती विविध मान्यवरांना वाटून खऱ्या इतिहासाचा प्रसार करण्याचे काम करणार असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.

आमच सरकार आल्यावर इंद्रजीत सावंतना ‘महाराष्ट्र भूषण’

पुढील सरकार आमचच येणार आहे. यामध्ये मी एखाद्या मोठ्या पदावर गेल्यावर इंद्रजीत सावंत यांना ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कार देऊ, अशी ग्वाही राणे यांनी दिली.

खरे जातीयवादी कोण?

निवडणुकीनंतर तलवारीला शेंडी भारी पडली असे संदेश वॉट्सअप वरुन फिरत होते. हा जातीयवाद नव्हे का ? असा सवाल करत खरा जातीयवादी कोण हे पाहण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.

सत्संगासारखा दुसरा वाईट बाजार नाही

सत्संगाच्या नावावर बुवा बाबांनी लोकांकडून लोकांची दिशाभूल केली जाते. या सारखा दुसरा कुठलाही वाईट बाजार नसून या ठिकाणी महिलाही सुरक्षित नसल्याचे ज्ञानेश महाराव यांनी सांगितले. वास्तव समजण्यासाठी इतिहास वाचा इतिहास आपण वाचत नाही, त्यामुळे वास्तव आपल्याला कळत नाही, त्यासाठी इतिहासाची पुस्तके वाचली पाहीजेत, असे महाराव यांनी सांगितले.