शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

संस्कृतीरक्षणाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना; श्री श्री रविशंकर यांचे गौरवउद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 12:43 IST

कोल्हापूर : आपल्या मनामनात असलेल्या भक्तीवर ताणतणावामुळे धूळ साठली आहे. निखाऱ्यावर राख धरली आहे. या भक्तिभावाच्या अभावामुळेच मानसिक अस्वस्थता ...

कोल्हापूर : आपल्या मनामनात असलेल्या भक्तीवर ताणतणावामुळे धूळ साठली आहे. निखाऱ्यावर राख धरली आहे. या भक्तिभावाच्या अभावामुळेच मानसिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही धूळ, राख झटका आणि मग प्रेमाच्या लाटा उसळत असल्याचा अनुभव घेत आपले जीवन सफल करा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले.साधकांच्या प्रचंड गर्दीने भरलेल्या तपोवन मैदानावर मंगळवारी रात्री रविशंकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बाराही तालुक्यातून आणि शेजारील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या २५ मिनिटांच्या मनोगतामध्ये रविशंकर यांनी सुखी जीवनाची किल्लीच सांगितली. आपले जीवन क्षणिक आहे. काळ वेगाने पुढे जात आहे. या मर्यादित जीवनाला सांभाळणारी कला आपल्याला आत्मसात करावी लागेल. मनातील भक्तिभाव जागृत केल्यानंतर येणाऱ्या आव्हानांना पेलण्याचीही ताकद तुम्हाला मिळेल. पंचमहाभूतांपासून शरीर बनले असले तरी आकाशाशी आपले नाते हवे. आपले सुखाचे आकाश कोरडे पडले आहे. त्याला भक्तीचे सिंचन केले तर आयुष्यात सफलता मिळेल.मी बारा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आलो हाेतो. तेव्हा ‘अभंगनाद’चे सादरीकरण झाले होते. आता हा भक्तीचा कुंभमेळा या ठिकाणी भरला आहे.रविशंकर यांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी भक्तिगीते, मर्दानी खेळ, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सव्वासात वाजता रविशंकर यांना वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. सर्वांना हात हलवून अभिवादन करण्यासाठी ते रॅम्पवरून उपस्थितांमध्ये आल्यानंतर त्यांची छबी टिपण्यासाठी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उठून उभे राहिले. कोणी त्यांना मोरपीस देत होते, कोणी हार देत होते. या सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करून त्यांनी नंतरच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांच्या दाम्पत्याच्या हस्ते गुळाची ढेप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय संस्कृती वाचवण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना रविशंकर म्हणाले, महाराष्ट्रात तुकाराम, ज्ञानेश्वरांसारखे अनेक संत होऊन गेले. वीर झाले. छत्रपती शिवाजी महाराज तर भवानीचे निस्सिम भक्त होते. माता, पिता, गुरुदेव आणि संतांचा सन्मान कसा करावा हे शिवाजी महाराजांनी जगाला दाखवून दिले. ही भारतीय संस्कृती वाचवण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते, अशा शब्दात रविशंकर यांनी महाराजांचा गौरव केला. त्यांच्यामुळेच तामिळनाडूपासून ते श्रीलंकेपर्यंतही मराठ्यांचा दबदबा होता.

नेटके संयोजनया महासंत्सगासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार हे गृहीत धरून नेटके संयोजन करण्यात आले होते. परंतु अनेकांना पासवरून नेमके कुठे जायचे कळत नव्हते, त्यामुळे प्रवेशव्दारांवर गर्दी झाली. खिद्रापूर येथील काेपेश्वर मंदिराचा मोठा फ्लेक्स व्यासपीठावर लावण्यात आला होता. एका बाजूला अंबाबाई तर दुसऱ्या बाजूला जोतिबाच्या प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या होत्या.नि:शब्द तपोवनआपल्या मनोगतानंतर रविशंकर यांनी सर्व उपस्थितांना ध्यान करण्याची सूचना केली. त्याबरोबर संपूर्ण मैदान शांत झाले. त्यांच्या सूचनेनुसार उपस्थित ध्यान प्रक्रिया करत होते आणि महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तपोवन मैदान पंधरा मिनिटांसाठी नि:शब्द झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज