शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
3
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
5
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
6
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
7
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
8
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
9
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
10
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
11
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल
12
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
13
Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
14
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
15
Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न
16
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
17
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
18
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
19
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
20
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदीपात्र फेसाने व्यापले आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडल्याने नदीकाठावर दुर्गंधी ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदीपात्र फेसाने व्यापले आहे. दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडल्याने नदीकाठावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याने पंधरा दिवसांपूर्वी शहरातील मैलायुक्त सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने नदी दूषित झाली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती; मात्र अवघे पंधरा दिवस उलटले असतानाच, पुन्हा नदीपात्रात दूषित पाणी आल्याने पंचगंगा काठचे नागरिक व शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तेरवाड बंधाऱ्यापासून इचलकरंजीपर्यंत नदीपात्र जलपर्णीने व्यापला आहे. त्यामुळे या पात्रातील पाणी दिसत नसले, तरी उग्र वास येत आहे. तर बंधाऱ्यापासून उत्तरेकडे पाण्याचे खरे रूप दिसत असून, पाण्यावर नजर पोहोचेपर्यंत रसायनयुक्त पाण्यामुळे फेस तयार होत आहे. बर्फासारखे गोळे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.

वारंवार प्रदूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी पिण्यासाठी नसले, तरी शेतीसाठी पाण्याचा वापर करत आहेत. मात्र, रसायनयुक्त पाण्यामुळे शेती नापिक बनत आहे. शिवाय शेतात पाठविण्यासाठी पाण्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्वचेच्या रोगाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो - १३०४२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - रसायनयुक्त साडपाण्यामुळे पंचगंगा नदीपात्र फेसाने व्यापले आहे.