शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

करवीर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST

मार्च ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्या. त्यांचा निकाल ...

मार्च ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडल्या. त्यांचा निकाल १८ जानेवारीला जाहीर झाला, पण सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे २७ जानेवारीला जाहीर करण्यात आले. या जाहीर झालेल्या आरक्षणात भामटे, खाटांगळे, उपवडे, घानवडे, वडकशिवाले येथे अनुसूचित जाती स्त्री आरक्षण आले, तर खेबवडे येथे अनुसूचित जमाती आरक्षण पडले. मात्र, या सात ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील सदस्यांचा अभाव असल्याने सरपंच निवडीच्या पहिल्या सभेत या गावांच्या सरपंचपद निवडी रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. फक्त उपसरपंच निवडी पार पडल्या. सरपंच पद रिक्त असल्याने आरक्षणात बदल करण्याचा अधिकार तहसीलदारांचा नसल्याने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षणाअभावी सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीचे फेरआरक्षण काढण्याचा आदेश १ मार्चला काढला होता. यात उपवडे, भामटे, खाटांगळे, घानवडे, वडकशिवाले तसेच खेबवडे येथील सरपंच पदाचे आरक्षण बदलण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि. ५ मार्च) पूर्ण झाली. यात उपवडे, भामटे, खाटांगळे, घानवडे, वडकशिवाले या गावात अनुसूचित जाती स्त्री आरक्षण होते. या ठिकाणी असलेले स्री आरक्षण रद्द करून फेरआरक्षणात अनुसूचित जाती असा बदल झाला आहे, तर गाडेगोंडवाडी ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती स्री ऐवजी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री आरक्षण आले आहे.

खेबवडे येथे अनुसूचित जमाती असलेल्या आरक्षण बदलासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती प्रवर्गमधून चिठ्ठीने आरक्षण काढण्यात आले.