शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

राज्यातील प्रसूतिगृहांचे बदलणार रूप १२३ दवाखान्यांचा समावेश; माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्राचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:50 IST

देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार आहे

समीर देशपांडे ।कोल्हापूर : देशभरातील माता, बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचे रूपडे पालटणार आहे. यासाठी मोठा निधी प्राप्त होणार असून, या सर्व दवाखान्यांकडून त्यांना लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

भारतातील माता, बालमृत्यू प्रमाण २0२0 पर्यंत प्रति १ लाख जन्मांमागे १00 पेक्षा कमी आणि महाराष्ट्रातील हेच प्रमाण ४0 पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सध्या भारताचा हा दर १५0 हून अधिक, तर महाराष्ट्राचा ६१ इतका आहे. बालमृत्यूचा भारताचा दर २८ आहे, तो २३ करणे आणि महाराष्ट्राचा सध्या १९ आहे, तो कमी करणे, असेही उद्दिष्ट आहे.

थोडक्यात, घरी प्रसूती न होता ती शासकीय दवाखान्यात व्हावी यासाठी हा प्रकल्प असून, यासाठी आता देशभरामध्ये मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील १२३ शासकीय दवाखान्यांची निवड केली आहे.

या सर्व निवड केलेल्या दवाखान्यांमधील प्रसूतिगृहांचा, स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणे, दरवाजे, टाईल्स बदलणे, दर्जेदार टेबल्सचा वापर करणे याबरोबरच प्रसूतीसाठी लागणारी सर्व वैद्यकीय साधने आणि मनुष्यबळ पुरवण्यासाठी या प्रकल्पांतर्गत काम केले जाणार आहे. येत्या वर्षभरामध्ये या सर्व दवाखान्यांच्या प्रसूतिगृहाचे रूपडे पालटण्यात येणार आहे. तसेच प्रसूतीसाठी खासगी गरज पडल्यास डॉक्टरांनाही बोलविण्यात येणार आहे.या दवाखान्यांचा समावेश१८ जिल्हा रुग्णालये, १३ स्त्री रुग्णालये, ४ सामान्य रुग्णालये, ५0 आणि १00 खाटांची सर्व उपजिल्हा रुग्णालये, २ शासकीय महाविद्यालये यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय आणि कसबा बावडा येथील सेवा केंद्राचा समावेश आहे. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालय आणि कोल्हापुरातील सीपीआरचा यामध्ये समावेश करावा, असाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

अजूनही घरामध्ये प्रसूती व्हावी, अशी अपेक्षा असते; मात्र माता आणि बालकासाठी दवाखान्यातील प्रसूती ही अत्यावश्यक बनली आहे. म्हणूनच दवाखान्यातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘लक्ष्य’ प्रकल्प आखला आहे.- डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा शल्य चिकि त्सक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल