शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:49 IST

केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा कोल्हापुरातून रणशिंग: पुण्यात सोमवारी होणार बैठक

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

या यात्रेच्या नियोजनासाठी पुण्यात काँग्रेस समिती कार्यालयात सोमवारी (दि. २०) दिवसभर आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचे आमदार सतेज पाटील हे समन्वयक आहेत.काँग्रेसने यापूर्वी माणिक ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना ‘जनजागरण’ यात्रा काढली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही काँग्रेसच्यावतीने ‘संघर्ष’ यात्रा काढण्यात आली. आता काँग्रेसने ही ‘परिवर्तन’ यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस हा सक्षम पर्याय आहे व लोकांनी परिवर्तन करावे, असा जनतेला विश्वास देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार आहे.

कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला सुरू होणारी ही यात्रा सांगली, कऱ्हाड , सातारा, सोलापूर करून पुण्यात सांगता होईल. ही यात्रा नऊ दिवसांची असून, रोज किमान २२ किलोमीटर जाणार आहे. प्रत्येक दिवशी तीन जाहीर सभांचे नियोजन आहे.

ती प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जावी, असे नियोजन करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा झाल्यावर गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ही यात्रा काढण्याचे पक्षाचे नियोजन आहे.केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा या यात्रेत वाचला जाणार आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी, फसलेली कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतील शिवाजी महाराजांचे स्मारक, वाढती महागाई, यांसह सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सरकारवर आसूड ओढला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या चार वर्षांत विविध निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनांत विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. लोक त्यांना कसा प्रतिसाद देतात यावर नेत्यांचे व त्या पक्षाचेही भवितव्य ठरणार आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर