शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:49 IST

केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा कोल्हापुरातून रणशिंग: पुण्यात सोमवारी होणार बैठक

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

या यात्रेच्या नियोजनासाठी पुण्यात काँग्रेस समिती कार्यालयात सोमवारी (दि. २०) दिवसभर आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचे आमदार सतेज पाटील हे समन्वयक आहेत.काँग्रेसने यापूर्वी माणिक ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना ‘जनजागरण’ यात्रा काढली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही काँग्रेसच्यावतीने ‘संघर्ष’ यात्रा काढण्यात आली. आता काँग्रेसने ही ‘परिवर्तन’ यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस हा सक्षम पर्याय आहे व लोकांनी परिवर्तन करावे, असा जनतेला विश्वास देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार आहे.

कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला सुरू होणारी ही यात्रा सांगली, कऱ्हाड , सातारा, सोलापूर करून पुण्यात सांगता होईल. ही यात्रा नऊ दिवसांची असून, रोज किमान २२ किलोमीटर जाणार आहे. प्रत्येक दिवशी तीन जाहीर सभांचे नियोजन आहे.

ती प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जावी, असे नियोजन करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा झाल्यावर गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ही यात्रा काढण्याचे पक्षाचे नियोजन आहे.केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा या यात्रेत वाचला जाणार आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी, फसलेली कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतील शिवाजी महाराजांचे स्मारक, वाढती महागाई, यांसह सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सरकारवर आसूड ओढला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या चार वर्षांत विविध निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनांत विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. लोक त्यांना कसा प्रतिसाद देतात यावर नेत्यांचे व त्या पक्षाचेही भवितव्य ठरणार आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर