शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

चंद्रकांतदादांचे वर्तन खलनायकासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ : पाच कोटींचा निधी परत घेतला; हीणकस राजकारण

कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझ्याबरोबर गतजन्मीचे वैर असल्यासारखे वागत आहेत. मात्र, माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद असल्याने ते माझे काहीही करू शकणार नाहीत. मात्र, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनतेला पालकमंत्र्यांच्या या डावपेचात बळी पडावे लागत आहे. गडहिंग्लज नगरपालिकेला दिलेला पाच कोटींचा निधी परत घेण्याचा शासनाचा निर्णय हा पालकमंत्र्यांच्या याच मनोवृत्तीतून झाला आहे. ते सिनेमातील खलनायकासारखे वर्तन करीत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली. कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील १२२ अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राखीव निधीतून देण्यात आले. यावेळी धनादेश वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, छावा अपंग संघटनेचे संतोष मिसाळ, आनंदा (आबा) चव्हाण, प्रकाश गाडेकर प्रमुख उपस्थित होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा आणि त्यांचा संबंध आलेला नाही. राजकीय अपयशातून निराश होत ते चुकीचे निर्णय घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लजच्या सत्ताधारी गटाने मदत केली म्हणून पाच कोटींचा निधी मंजूर करून तो वितरित केला. मात्र, श्रीपतराव शिंदे व आमची युती होऊन गडहिंग्लज कारखान्यात आमचा विजय झाला, म्हणून दिलेले पाच कोटी रुपये परत घेण्याचे हीणकस राजकारण चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. राजकीय द्वेषापोटी कागललाही वगळले आहे. नगराध्यक्षा गाडेकर यांनी स्वागत केले. प्रकाश गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. भैया माने, मनोहर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आशाकाकी जगदाळे, संजय चितारी, सुनील माळी, किरण मुळीक, अंजूम मुजावर, रंजना सणगर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) न्यायालयात जाऊ... मुख्यमंत्र्यांनाही भेटू... आ. मुश्रीफ म्हणाले की, दिलेला पाच कोटींचा निधी परत घेतला जाऊ शकतो का? याबद्दल न्यायालयातही जाण्याचा आपला विचार आहे. ‘ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी’ याप्रमाणे आम्ही पालकमंत्र्यांना यापुढे प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबद्दल भेटू. कोल्हापूर जिल्ह्यात यामुळेच भाजप पक्षाला यश मिळू शकलेले नाही हे निदर्शनास आणून देऊ.