शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

चंद्रकांतदादांचे वर्तन खलनायकासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ : पाच कोटींचा निधी परत घेतला; हीणकस राजकारण

कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझ्याबरोबर गतजन्मीचे वैर असल्यासारखे वागत आहेत. मात्र, माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद असल्याने ते माझे काहीही करू शकणार नाहीत. मात्र, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनतेला पालकमंत्र्यांच्या या डावपेचात बळी पडावे लागत आहे. गडहिंग्लज नगरपालिकेला दिलेला पाच कोटींचा निधी परत घेण्याचा शासनाचा निर्णय हा पालकमंत्र्यांच्या याच मनोवृत्तीतून झाला आहे. ते सिनेमातील खलनायकासारखे वर्तन करीत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली. कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील १२२ अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राखीव निधीतून देण्यात आले. यावेळी धनादेश वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, छावा अपंग संघटनेचे संतोष मिसाळ, आनंदा (आबा) चव्हाण, प्रकाश गाडेकर प्रमुख उपस्थित होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा आणि त्यांचा संबंध आलेला नाही. राजकीय अपयशातून निराश होत ते चुकीचे निर्णय घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लजच्या सत्ताधारी गटाने मदत केली म्हणून पाच कोटींचा निधी मंजूर करून तो वितरित केला. मात्र, श्रीपतराव शिंदे व आमची युती होऊन गडहिंग्लज कारखान्यात आमचा विजय झाला, म्हणून दिलेले पाच कोटी रुपये परत घेण्याचे हीणकस राजकारण चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. राजकीय द्वेषापोटी कागललाही वगळले आहे. नगराध्यक्षा गाडेकर यांनी स्वागत केले. प्रकाश गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. भैया माने, मनोहर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आशाकाकी जगदाळे, संजय चितारी, सुनील माळी, किरण मुळीक, अंजूम मुजावर, रंजना सणगर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) न्यायालयात जाऊ... मुख्यमंत्र्यांनाही भेटू... आ. मुश्रीफ म्हणाले की, दिलेला पाच कोटींचा निधी परत घेतला जाऊ शकतो का? याबद्दल न्यायालयातही जाण्याचा आपला विचार आहे. ‘ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी’ याप्रमाणे आम्ही पालकमंत्र्यांना यापुढे प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबद्दल भेटू. कोल्हापूर जिल्ह्यात यामुळेच भाजप पक्षाला यश मिळू शकलेले नाही हे निदर्शनास आणून देऊ.