शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील बोलले अन् सत्ता गेली, तसे मुश्रीफ यांचे व्हायला नको-श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:53 IST

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उंचगी प्रकल्पात पाणीसाठा होईल असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता गेली. ...

ठळक मुद्देतुमच्या कारकीर्दीत पाणी साठेल त्यापूर्वी पुनर्वसन व्हायलाच हवे. आंबेओहळ निर्धार परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा इशारा

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उंचगी प्रकल्पात पाणीसाठा होईल असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता गेली. तसं ग्रामविकास हसन मुश्रीफ यांचे व्हायला नको, तत्पूर्वी आंबेओहळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी दिला.उत्तूर (ता. आजरा) येथील आंबेओहळ धरणग्रस्तांच्या आयोजित निर्धार परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.शिंदे म्हणाले, प्रकल्पाचे पाणी पुनर्वसनाशिवाय अडविल्यास धरणग्रस्त खड्डे काढून पाण्यात उभे राहतील. मंत्री झाले म्हणजे धरण झालं असे कोणी समजू नये. धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना क्षमा नाही. खोटा पंचनामा करणाऱ्यांना काय शिक्षा करणार ?आंबेओहळ प्रकल्पाची लढाई आता सुरू झाली आहे. पाणी मुश्रीफ यांच्या कारकिर्दीत अडविले जाईल. पण, कधी पुर्नवसन होईल तेव्हा. अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्यासारखी सत्ता जाईल असे सुतोवाच शिंदेंनी केले. कॉ. संपत देसाई म्हणाले, परिषदेने संघटनेला बळ मिळाले आहे. संघटीत राहून पुनर्वसन करुन घेवूया. सामूहिक वचन पाळून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रखडलेले प्रश्न सोडवूया.कॉ. अशोक जाधव म्हणाले, मुश्रीफ यांनी घळभरणी करतानाचा कायदा याचा अभ्यास करावा मगच बोलावे. पुनर्वसन अगोदर मग घळभरणी हा कायदा असताना मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत धरणग्रस्तांची दिशाभूल केली.धरणात पाणी तुंबेल ते धरणग्रस्तांच्या परवानगीनेच कुणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी पाणी तुंबवू नका असा इशाराही कृष्णा खोरेंच्या अधिकाऱ्यांना दिला.शंकर पावले म्हणाले, २००२-०३ सालच्या टिपण्णीत धरणग्रस्तांसाठी ७०० हेक्टर जमीन होती. या जमिनी कुठे गेल्या यांची चौकशी झाली पाहिजे. परिषदेत जि.प. सदस्य उमेश आपटे, कॉ. संजय तर्डेकर, संतोष बेलवाडकर, बाळेश नाईक, सुरेश मिटके, सदानंद व्हनबट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गडहिंग्लजचे नगरसेवक उदय कदम, राजू देशपांडे, सागर सरोळकर, अमोल बांबरे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन कृष्णा-खोरेचे अधिकारी यांना देण्यात आले.

परिषदेच्या मागण्याधरणग्रस्तांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, व पुनर्वसन अधिकारी समवेत व्यापक बैठक घ्या, संकलन दुरुस्ती करा, संपादित जमिनीवरील स्थगिती आदेश उठवा, भूखंड वाटप तातडीने करा, जमिनी वर्ग -१ करून द्या, पॅकेज संदर्भात सक्ती नको, करपेवाडी जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवा, न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करा, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनी कसण्यासाठी अडथळे येत आहेत ते दूर करा.

 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर