शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

पूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्क, जनतेने सहकार्य करावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:23 IST

कोल्हापूर : राज्यात पावसाचा जोर वाढल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन बचाव आणि मदत ...

ठळक मुद्देपूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्कजनतेने सहकार्य करावे : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात पावसाचा जोर वाढल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन बचाव आणि मदत कार्यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्क आणि सजग आहे, जनतेने घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.गेल्या आवठवडयाभरापासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरण प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांना आलेला महापूर यामुळे जिल्हया-जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन सतर्क असून धरण प्रकल्पामधील पाणीसाठा, धरण क्षेत्रात पडणारा पाऊस अणि नद्यांना आलेला पूर या साऱ्यांचा अभ्यास करुन धरण प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनास केली आहे.

पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखून जिल्हा प्रशासन काम करीत आहे. पूरबाधित जनतेला सुरक्षित ठिकाणी हलविण्याबरोबरच त्यांना आवश्यक सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देशही प्रशासनास दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर त्यांच्या मदतीला विविध राजकीय पक्ष, सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी पूरग्रस्तांच्या मदतीला जाणे गरजेचे आहे. पाऊस कमी करणे हे आपल्या हातात नाही, मात्र पूरपरिस्थितीवर मात करणे आपल्या हातात असल्याने सर्वानी मिळून पूरपरिस्थितीवर मात करण्यात सक्रीय होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.पूर परिस्थिती असली तरी जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही, सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा शासन आणि प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असून यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, एनडीआरफ कार्यरत असून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबरच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटना पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्याला सक्रीय झाल्या आहेत. जिल्हयातील जनतेने घाबरुन न जाता सतर्कता बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, पूराबाबतच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी तसेच पूरपरिस्थितीतील अडचणी, धोके याबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी टोल फ्री क्रंमाक 1077 वर संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर