शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

पूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्क, जनतेने सहकार्य करावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 19:23 IST

कोल्हापूर : राज्यात पावसाचा जोर वाढल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन बचाव आणि मदत ...

ठळक मुद्देपूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्कजनतेने सहकार्य करावे : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात पावसाचा जोर वाढल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन बचाव आणि मदत कार्यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्क आणि सजग आहे, जनतेने घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.गेल्या आवठवडयाभरापासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरण प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांना आलेला महापूर यामुळे जिल्हया-जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन सतर्क असून धरण प्रकल्पामधील पाणीसाठा, धरण क्षेत्रात पडणारा पाऊस अणि नद्यांना आलेला पूर या साऱ्यांचा अभ्यास करुन धरण प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनास केली आहे.

पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखून जिल्हा प्रशासन काम करीत आहे. पूरबाधित जनतेला सुरक्षित ठिकाणी हलविण्याबरोबरच त्यांना आवश्यक सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देशही प्रशासनास दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर त्यांच्या मदतीला विविध राजकीय पक्ष, सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी पूरग्रस्तांच्या मदतीला जाणे गरजेचे आहे. पाऊस कमी करणे हे आपल्या हातात नाही, मात्र पूरपरिस्थितीवर मात करणे आपल्या हातात असल्याने सर्वानी मिळून पूरपरिस्थितीवर मात करण्यात सक्रीय होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.पूर परिस्थिती असली तरी जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही, सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा शासन आणि प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असून यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, एनडीआरफ कार्यरत असून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबरच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटना पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्याला सक्रीय झाल्या आहेत. जिल्हयातील जनतेने घाबरुन न जाता सतर्कता बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, पूराबाबतच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी तसेच पूरपरिस्थितीतील अडचणी, धोके याबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी टोल फ्री क्रंमाक 1077 वर संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर