शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चंदगड, राधानगरी, हातकणंगलेतील मतदान घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:54 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देचंदगड, राधानगरी, हातकणंगलेचे मतदान घटले: स्थलांतर, मयत, दुबार आदींमुळे नावे झाली कमी इतर सात विधानसभा मतदारसंघांत मतदान वाढले : अंतिम मतदार यादीतील माहिती

प्रवीण देसाईकोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे तर उर्वरित सात विधानसभा मतदारसंघांत मतदारयाद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान काही हजारांमध्ये वाढले आहे. या कार्यक्रमांतर्गत स्थलांतर, दुबार नावे आदी कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याने मतदान पूर्वीपेक्षा काही प्रमाणांत कमी झाल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनाकांवर आधारित दि. १५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत मतदार याद्या पुनर्रिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये नावनोंदणीसह नाव वगळणीचे ही अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये मृत, दुबार व स्थलांतरीत अशी नावे कमी झाल्याने चंदगड, राधानगरी, हातकणंगले मतदारसंघांतील मतदान घटले आहे.

चंदगडमध्ये पूर्वी ३ लाख १९ हजार २४६ इतके मतदान होते. ते आता ३ लाख १८ हजार ९१३ इतके झाले आहे. राधानगरीचे पूर्वी मतदान ३ लाख २६ हजार ३०८ इतके होते, ते आता ३ लाख २५ हजार ५३८ झाले आहे तर हातकणंगले मतदारसंघातील पूर्वी मतदान ३ लाख १८ हजार २४५ इतके होते, ते आता ३ लाख १७ हजार ६६८ इतके झाले आहे; तर वाढलेल्या मतदानामध्ये कागलमधील पूर्वीचे मतदान ३ लाख २१ हजार २६५ इतके होते ते आता ३ लाख २२ हजार ४६९, कोल्हापूर दक्षिणमध्ये पूर्वी ३ लाख २२ हजार ५७६ होते, ते आता ३ लाख २४ हजार ३६७, करवीरमध्ये पूर्वी ३ लाख २ हजार १३९ होते ते आता ३ लाख ३१ हजार ७७, कोल्हापूर उत्तरमध्ये पूर्वी २ लाख ८३ हजार ८८५ होते, ते आता २ लाख ८५ हजार ४४७, शाहूवाडीमध्ये पूर्वी २ लाख ८७ हजार ४१९ होते, ते आता २ लाख ८७ हजार ४४७, इचलकरंजीमध्ये पूर्वी २ लाख ९३ हजार १९६ इतके होते, ते आता २ लाख ९३ हजार २४३, शिरोळमध्ये पूर्वी ३ लाख १० हजार ८९९ इतके होते, ते आता ३ लाख १२ हजार ३९१ इतके झाले आहे.

साडेपाच हजार मतदान वाढलेअंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन यामध्ये जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत ३० लाख ९० हजार मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये तीन मतदारसंघातील घटले असून उर्वरीत सात मतदारसंघांतील मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतदानामध्ये पूर्वीच्या तुलनेत ५ हजार ४८५ मतदानाची भर पडली आहे. पूर्वी जिल्ह्याचे मतदान ३ लाख ८५ हजार १७८ इतके होते. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर