शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

महिलांच्या दर्गा प्रवेशास अंमलबजावणीचे आव्हान

By admin | Updated: August 27, 2016 00:46 IST

न्यायालयाच्या निकालाचे स्वागत : पुरोगामित्वाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल

कोल्हापूर : हिंदू मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाच्या निर्णयानंतर आता उच्च न्यायालयाने महिलांना मुंबईतील हाजी अली दर्ग्यात प्रवेश देण्याचा निकाल दिला आहे. हा निकाल स्वागतार्ह असला तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने सर्व हिंदू मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश द्यावा, असा निर्णय दिला होता. त्यावर मतमतांतरे, वादांनंतर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरासह महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी प्रवेश केला. आता उच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांसह अन्य महिलांना दर्ग्यात प्रवेश करता येईल, असा निकाल दिला आहे. मुस्लिम महिलांना दर्ग्यांमध्ये किंवा मशिदींमध्ये प्रवेश दिला जात नाही. हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या जाकिया सोमन यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी मुंबई न्यायालयाने हा निकाल दिला. त्यावर हाजी अली दर्गा ट्रस्टला सहा आठवड्यांत याचिका दाखल करण्यासाठीचा कालावधी देण्यात आला. हा निकाल स्त्री-पुरुष समानता आणि पुरोगामित्वाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होते, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. दर्ग्यांमध्ये महिलांना जाण्यास मनाई नाही; पण त्यांच्यासाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली असते. त्यामुळे महिलांचा दर्ग्यांमध्ये जाण्याचा व न जाण्याचा प्रश्न येत नाही. राज्यघटनेने महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिले आहेत. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व अन्य क्षेत्रांतही महिलांना समान हक्क मिळाले पाहिजेत. - शमा मुल्ला, उपमहापौरस्त्री-पुरुष समानतेसाठीचा न्यायालयाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य आहे. पूर्वीच्या लोकांनी अंधश्रद्धा म्हणून नव्हे, तर शास्त्रीय आधारावर काही निर्णय ठरविलेले असतात. त्यामागे एक उद्देश असतो. त्यांचे आजही पालन केले जाते. कब्रस्तानमध्येदेखील महिला जात नाहीत. मात्र, हा निर्णय पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून पाहिला तर चांगला आहे. - हसिना फरास, नगरसेविकापूर्वीच्या काळी महिला आणि पुरुष मशिदीत नमाज पठण करायचे. त्यानंतरच्या काळात महिलांनी घरीच नमाज पठण करावे, असा निर्णय देण्यात आला. ज्या ठिकाणी दफनविधी झालेला असतो, त्या ठिकाणी महिलांनी जाऊ नये, असा एक नियम आहे. त्यामुळे महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. - निलोफर आजरेकर, नगरसेविकाबदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे काळाप्रमाणे धर्मानेही बदलले पाहिजे. लोकशाहीने महिलांना दिलेला समानतेचा अधिकार धर्मानेही आचरणात आणायला हवा. महिलांना आजवर संघर्ष करूनच आपले हक्क आणि अधिकार मिळवावे लागले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्वाचे पाऊल आहे. - मेघा पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या