शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बालकल्याण समितीची अध्यक्षपदे वर्षभरापासून रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:34 IST

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील याच समित्यावरील सदस्यांच्या २३ पदांची आहे. त्याही नियुक्त्या लोंबकळत पडल्या आहेत. त्याचा या समितीच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देबालकल्याण समितीची अध्यक्षपदे वर्षभरापासून रिक्तचकोल्हापूर-सिंधुदुर्गमधील चित्र : १७ जिल्ह्यांतील सदस्यपदे रिक्त

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील याच समित्यावरील सदस्यांच्या २३ पदांची आहे. त्याही नियुक्त्या लोंबकळत पडल्या आहेत. त्याचा या समितीच्या कामकाजावर परिणाम होत आहे.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील प्र्रकरण ५ मधील कलम २७ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बालकल्याण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे.विधिसंघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज बालकांच्या बालहक्क, पुनर्वसन या संदर्भातील निर्णय घेणारी ही न्यायिक समिती आहे. भाजप सरकारच्या काळात कोल्हापूरच्या अध्यक्षपदी मे २०१८ मध्ये शुभांगी जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांनी आठ महिने काम केले. त्या इचलकरंजी नगरपालिकेत नोकरीस होत्या. कौटुंबिक कारणांतून त्यांना वेळ देता येईना म्हणून त्यांनी आठ महिन्यांत राजीनामा दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अध्यक्षांसह सदस्यांचीही पाच पदे रिक्त आहेत. तिथे आधीच्या समितीलाच मुदतवाढ दिली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी महिला बालकल्याण आयुक्तांनी १५ जून २०१९ रोजी अर्ज मागविले. त्यानुसार मुलाखती झाल्या; परंतु कुणालाच अजून नियुक्ती देण्यात आलेली नाही. या पदाची कायदेशीर मुदत तीन वर्षांसाठी आहे. त्यांतील दोन वर्षे संपली आहेत.

आता नव्याने सदस्यांची कधी निवड होणार आणि ती उर्वरित काळासाठी होणार की पुन्हा तीन वर्षांसाठी हा प्रश्न आहे. या नियुक्त्या राज्यपालांच्या मान्यतेने होत असल्या तरी त्यांवर राज्य सरकारचा अंकुश असतो. मधल्या काळात राज्यात सत्तांतर झाले; त्यामुळे यापूर्वीच प्रस्ताव मागविलेल्या लोकांना संधी देणार की नव्याने ही सगळीच प्रक्रिया राबविणार याबाबत संभ्रम आहे.

या समितीच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीस विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नियमित अध्यक्ष व नियमानुसार कामकाज होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने या समितीवरील रिक्त पदे तातडीने भरावीत.- अतुल देसाईआभास फौंडेशन, कोल्हापूर 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर