शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:45 IST

pruthwirajpchavan, congressrally, kolhapurnews घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न. पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅली

कोल्हापूर : घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीला चव्हाण मार्गदर्शन करत होते. राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत ऑनलाईन सहभागी झाले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते संगमनेर, औरंगाबाद, नंदूरबार, नागपूर, कोल्हापूर, पालघर, अमरावती, ग्वाल्हेर येथून सहभागी झाले.कॉंग्रेस सरकारच्या काळात देशभरात शेतीमालाला किमान हमीभाव, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्नसुरक्षा अशी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली, परंतु मोदी सरकारने ती उद्‌ध्वस्त करून शेतकऱ्यांचे वाटोळे केले. असा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदींनी शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, पण किती उत्पन्न वाढविले सांगायला तयार नाहीत.

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ म्हणून सांगितले, पण सत्तेत येताच असा भाव देऊ शकत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. असे ते म्हणाले. शेतकरी, कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विकासाऐवजी विकण्याचे कामसत्तेवर येताना विकास करण्याचे आश्वासन दिले, पण सत्तेवर येताच विकासमधील ह्यसह्ण काढून टाकला आणि सहकार, शेती, बँका विकण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. कॉंग्रेसने देशातील पन्नास कोटी शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केले, पण मोदी यांनी काळे कायदे करून एका रात्रीत रस्त्यावर आणले, असे पाटील म्हणाले.राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. शेती आणि शेतकऱ्यास वाचविण्याचे कॉंग्रेसने केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, समन्वय देवीदास भन्साळी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर