शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

महापूराने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:58 IST

आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.

ठळक मुद्देमहापूराने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणीग्रामस्थांशी संवाद साधला

कोल्हापूर : आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.महापूराने झालेल्या नुकसानीचा या केंद्रीय पथकाने गेल्या दोन दिवसात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आढावा घेतला. दोन वेगवेगळ्या केंद्रीय पथकांनी आज आंबेवाडी, चिखली गावांसह अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी, केर्ली, वाडी रत्नागिरी, राजाराम बंधारा, वडगणे, तसेच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर, गवत मंडई, कुंभार गल्ली तसेच शिवाजी पूल परिसराला भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.पॉलिसी अ‍ॅन्ड प्लॅनिंग, नवी दिल्लीचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकामध्ये नवी मुंबईचे अधिक्षक अभियंता संजय जयस्वाल होते. या केंद्रीय पथकात आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत  विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांत सचिन इथापे, करवीरचे तहसीलदार सचिन गिरी, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने अर्जुनवाड येथील वाहून गेलेली शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान, महावितरणचे झालेले नुकसान, प्राथमिक आरोग्य उप केंद्र, दलित वस्तीतील पडलेली घरे यांची पाहणी केली. यानंतर शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी येथील यंत्रमागाचे नुकसान, सोयाबीन, ऊस पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केर्ली-वाडी रत्नागिरी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच शिवाजी पूलाच्या परिसराचीही पाहणी केली.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर