शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पेट्रोल पंप सोळाशे साठ..तरी नव्यांचा घाट; कोल्हापूर जिल्ह्यातील निम्मे पंप तोट्यात

By पोपट केशव पवार | Updated: March 7, 2025 13:13 IST

अंतरावरची अट शिथिल केल्याने व्यवसायावर परिणाम

पोपट पवार कोल्हापूर : शहरात दोनशे तीनशे फुटांवर तर ग्रामीण भागात एक-दीड किलोमीटरवर पेट्रोलपंप असताना आता केंद्र सरकारने महाराष्ट्रात १६६० नवीन पेट्रोल-डिझेल पंपांना मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या पंपांमुळे राज्यात ३० हजारांपेक्षा जास्त रोजगार मिळेल, असा दावा राज्य सरकार करत असले तरी मुळात आहेत ते पेट्रोल पंप गिऱ्हाईक नसल्याने बंद पडत आहेत, काही बंदही पडले आहेत. असे असताना सरकार नव्या पंपांना मान्यता देऊन आताच्या पंपमालकांना बेरोजगारीच्या खाईत तर ढकलत नाही ना, असा सवाल पेट्रोलपंपचालकांमधून उपस्थित केला जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २८० पेक्षा अधिक पंप आहेत. केंद्रांची मंजुरी मिळाल्याने आता नव्याने जवळपास ४० हून अधिक पंप जिल्ह्यात होतील. म्हणजे ही संख्या तीनशेच्या वर जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील ६० टक्के पंप तोट्यात आहेत. असे असताना पुन्हा नव्याने पंप झाले तर सगळ्यांच्याच व्यवसायावर परिणाम होणार आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आल्याने पेट्रोल-डिझेलचा वापर कमी झाला आहे. या वाहनांचा वाढता वापर पेट्रोलपंपचालकांच्या मुळावर आला आहे.खर्च वाढतोय, गिऱ्हाईकांची संख्या होतेय कमीजिल्ह्यात रोज साडेतीन लाख लीटर पेट्रोल तर चार लाखांपेक्षा अधिक लीटर डिझेलची विक्री होते. याचे कमिशन लीटरला दहापैसे, वीस पैसे असे असते. सध्या सरकारने पेट्रोलपंपांना काही अटी व नियम घालून दिले आहेत. त्यानुसार सुविधा देणे बंधनकारक केले आहे. याचा सारा खर्च पंपचालकालाच करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढत असताना गिऱ्हाईकांची संख्या मात्र कमी होत आहे. परिणामी, पंपचालकांना पंप चालवणे अवघड होऊन बसले आहे.

अंतरावरची अट शिथिल केल्याने व्यवसायावर परिणामएक पंप नव्याने उभारायचे म्हंटले तरी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. शासनाच्या विविध परवानग्यांसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. पूर्वी एका पंपापासून दुसरा पंप किती अंतरावर असावा याचे नियम हाेते. त्यामुळे वीस वीस किलोमीटरवर एकाच पंपाला मान्यता मिळायची. त्यामुळे त्याचा व्यवसायही जोरदार चालायचा. सध्या ही अंतरावरची अटच शिथिल केल्याने फुटा फुटांवर पंप आहेत. त्यामुळे दोघांचाही व्यवसाय व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे.कागल-वाठार मार्गावरील २० पंप तोट्यातपुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल ते वाठार या मार्गावर ३० पंप आहेत. यातील २० पंप तोट्यात असल्याचा दावा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पुढे कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा पेट्रेल-डिझेल स्वस्तात मिळते. त्यामुळे या पंपांवर महामार्गावरील वाहने थांबत नसल्याचे चित्र आहे.वाहनांची संख्या अशी

  • दुचाकी : ११,९८,५१०
  • चारचाकी : ३,२०,४१५
  • अवजड वाहने : १,३००००

राज्यात १६६० पेट्रोलपंप नव्याने होत असले तरी इलेक्ट्रिक वाहनांमुळे आताच्या पेट्रोल-डिझेल पंपांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. काही पंप बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन पंपांना मंजुरी जुन्या पंपांना अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. -अरविंद तराळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPetrol Pumpपेट्रोल पंपCentral Governmentकेंद्र सरकार