शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पेट्रोल पंप सोळाशे साठ..तरी नव्यांचा घाट; कोल्हापूर जिल्ह्यातील निम्मे पंप तोट्यात

By पोपट केशव पवार | Updated: March 7, 2025 13:13 IST

अंतरावरची अट शिथिल केल्याने व्यवसायावर परिणाम

पोपट पवार कोल्हापूर : शहरात दोनशे तीनशे फुटांवर तर ग्रामीण भागात एक-दीड किलोमीटरवर पेट्रोलपंप असताना आता केंद्र सरकारने महाराष्ट्रात १६६० नवीन पेट्रोल-डिझेल पंपांना मान्यता दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या पंपांमुळे राज्यात ३० हजारांपेक्षा जास्त रोजगार मिळेल, असा दावा राज्य सरकार करत असले तरी मुळात आहेत ते पेट्रोल पंप गिऱ्हाईक नसल्याने बंद पडत आहेत, काही बंदही पडले आहेत. असे असताना सरकार नव्या पंपांना मान्यता देऊन आताच्या पंपमालकांना बेरोजगारीच्या खाईत तर ढकलत नाही ना, असा सवाल पेट्रोलपंपचालकांमधून उपस्थित केला जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यात २८० पेक्षा अधिक पंप आहेत. केंद्रांची मंजुरी मिळाल्याने आता नव्याने जवळपास ४० हून अधिक पंप जिल्ह्यात होतील. म्हणजे ही संख्या तीनशेच्या वर जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील ६० टक्के पंप तोट्यात आहेत. असे असताना पुन्हा नव्याने पंप झाले तर सगळ्यांच्याच व्यवसायावर परिणाम होणार आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आल्याने पेट्रोल-डिझेलचा वापर कमी झाला आहे. या वाहनांचा वाढता वापर पेट्रोलपंपचालकांच्या मुळावर आला आहे.खर्च वाढतोय, गिऱ्हाईकांची संख्या होतेय कमीजिल्ह्यात रोज साडेतीन लाख लीटर पेट्रोल तर चार लाखांपेक्षा अधिक लीटर डिझेलची विक्री होते. याचे कमिशन लीटरला दहापैसे, वीस पैसे असे असते. सध्या सरकारने पेट्रोलपंपांना काही अटी व नियम घालून दिले आहेत. त्यानुसार सुविधा देणे बंधनकारक केले आहे. याचा सारा खर्च पंपचालकालाच करावा लागतो. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढत असताना गिऱ्हाईकांची संख्या मात्र कमी होत आहे. परिणामी, पंपचालकांना पंप चालवणे अवघड होऊन बसले आहे.

अंतरावरची अट शिथिल केल्याने व्यवसायावर परिणामएक पंप नव्याने उभारायचे म्हंटले तरी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. शासनाच्या विविध परवानग्यांसाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. पूर्वी एका पंपापासून दुसरा पंप किती अंतरावर असावा याचे नियम हाेते. त्यामुळे वीस वीस किलोमीटरवर एकाच पंपाला मान्यता मिळायची. त्यामुळे त्याचा व्यवसायही जोरदार चालायचा. सध्या ही अंतरावरची अटच शिथिल केल्याने फुटा फुटांवर पंप आहेत. त्यामुळे दोघांचाही व्यवसाय व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे.कागल-वाठार मार्गावरील २० पंप तोट्यातपुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल ते वाठार या मार्गावर ३० पंप आहेत. यातील २० पंप तोट्यात असल्याचा दावा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. पुढे कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा पेट्रेल-डिझेल स्वस्तात मिळते. त्यामुळे या पंपांवर महामार्गावरील वाहने थांबत नसल्याचे चित्र आहे.वाहनांची संख्या अशी

  • दुचाकी : ११,९८,५१०
  • चारचाकी : ३,२०,४१५
  • अवजड वाहने : १,३००००

राज्यात १६६० पेट्रोलपंप नव्याने होत असले तरी इलेक्ट्रिक वाहनांमुळे आताच्या पेट्रोल-डिझेल पंपांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. काही पंप बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन पंपांना मंजुरी जुन्या पंपांना अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. -अरविंद तराळ, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPetrol Pumpपेट्रोल पंपCentral Governmentकेंद्र सरकार