शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

कर्नाटकला केंद्राची साथ खेदाची

By admin | Updated: October 19, 2014 00:41 IST

विचारवंतांची प्रतिक्रिया : मराठी भाषिक संतप्त

कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी केंद्रातील सरकार कर्नाटकला साथ देऊन बेळगावचे बेळगावी करण्याला मंजुरी दिली आहे, ही खेदाची बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विचारवंतांनी व मराठी भाषिकांनी व्यक्त केल्या. निपाणी, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठीबहुल अशी ८१४ गावे महाराष्ट्रात येण्यास अनेक वर्षांपासून उत्सुक आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लोकशाहीचे सर्व मार्ग यासाठी अवलंबले. तरीही सीमाभागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पूर्ण झालेली नाही. कर्नाटक शासन सीमाभागातील मराठी भाषिकांची संधी मिळेल त्यावेळी गळचेपी करीत आहे. कन्नडची सक्ती करीत आहेत. कानडीकरणाचाच एक भाग म्हणून कन्नड उच्चाराप्रमाणे बेळगावचे बेळगावी असे नामातंर करण्याचा घाट केला. सन २००६ केंद्राकडे प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने बेळगावसह ११ शहरांची नावे बदलण्यासाठी मंजुरी दिली. यावर सीमाभागातील मराठी भाषिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शहर शिवसेनेतर्फे केंद्राच्या ‘बेळगावी’च्या निर्णयाविरोधी छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र शासनाच्या बेळगावीच्या निर्णयाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, मंदार तपकिरे, शिवाजी जाधव, ईश्वर घाडगे, रणजित जाधव, विजय कुलकर्णी, राज जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘लोकमत’शी बोलताना अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना केंद्रातील भाजप सरकार बेळगावी करण्याला मंजुरी देऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. बेळगावी करण्याला मंजुरी देऊन कर्नाटकला केंद्र शासनाने चिथावणी दिली आहे, ही खेदाची गोष्ट आहे. बेळगावी करण्याच्या निर्णयामुळे भाजपचा व्यवहार मात्र उलटा असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)