शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताचे केंद्रबिंदू ‘कमतनूर गेट’

By admin | Updated: August 27, 2015 23:53 IST

संकेश्वरातील वाहतूक समस्या : दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली

विलास घोरपडे - संकेश्वर भागातील कमतनूर गेट मार्गावर यरगट्टी व जेवरगी हे कर्नाटकचे दोन राज्यमार्ग, तर महाराष्ट्रातील सांगली बाजारपेठेमुळे रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. यामुळे लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी ‘कमतनूर गेट’ म्हणजे डेंजर झोन अशी स्थिती बनली आहे.संकेश्वर शहरापासून २ कि.मी. अंतरावरील कमतनूर गेट अर्थात ‘सर्कल’नजीक हॉटेल, ढाबा, वाईन्स शॉपच्या विळख्याने लोकांची वर्दळ असते. ग्रामीण भागातील नागरिकांचा संकेश्वर बाजारपेठेशी संपर्कासाठी जीप, टमटम, मॅक्सीकॅब आदी ‘वडाप’ यांचा वावर असतो. सोबत निडसोशी पॉलिटेक्निकमध्ये शालेय विद्यार्थी दुचाकीवरून वेगाने जात असतात. तथापि, सर्कलनजीक अरद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. परिसरात कपराळ ओढ्याच्या वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने नवख्या चालकांना रहदारीमुळे ब्रेक लावताना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.ऊस गळीत हंगामात हिरा शुगर (संकेश्वर), सतीश शुगर्स (हुणचाळ), ओम शुगर (जैनापूर)ची वाहतूक या मार्गावरूनच होते. सोबत परप्रांतातील सद्भक्त सौंदत्ती यल्लम्मा देवदर्शनास व गोकाक फॉल्स् येथे पर्यटनास जातात; पण सर्कलवर दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली आहे. यामुळे प्रवासी गोंधळून जातात.कर्नाटकातील १२ क्रमांकाच्या संकेश्वर-विजापूर-जेवरगी या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ नेहमीच असल्याने या राज्यमार्गास राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४ मध्ये रूपांतर करून संकेश्वर-विजापूर रस्ता रुंदीकरण करावा, अशी मागणी गत दोन महिन्यांपूर्वी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.उपाययोजना गरजेच्यासंकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जानेवारी २०१५ ते जुलै २०१५ या सात महिन्यांच्या काळात २१ विविध ठिकाणच्या अपघातांत नऊ ठार, तर २१ जखमी झाले. त्यात काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याठिकाणी घडणाऱ्या अपघाताला पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व कर्नाटक राज्य रस्ते विकास महामंडळाने संयुक्तपणे सर्कलनजीक असणारी दुकाने हटवून, रस्ता रुंदीकरण, मार्गावरील झुडपे हटविणे, चारही मार्गांवर दिशादर्शक फलक लावून दुभाजक बनविणे गरजेचे ठरणार आहे.