शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी मार्च २०२० मध्ये आपण सगळे याच अविर्भावात होतो. सगळे गाफील राहिलो आणि बघता बघता उद्रेक झाला. आरोग्य यंत्रणा कोलमडली, परिस्थिती हाताबाहेर गेली. उपचार मिळेनात, रुग्णालयात बेड मिळेना... अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायची नसेल, तर स्वत:ची काळजी घ्या, मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा... होय, कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय.

गतवर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती सामान्य आहे. रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्वच नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता कोरोना संपला, लस आलेली आहे, आता काही होणार नाही... असाच समज अनेकांचा झाला आहे. परंतु हा समज काहीसा आत्मघातकी ठरू शकतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. धोका आजही कायम आहे.

जगाच्यादृष्टीने वाईट ठरलेले २०२० साल संपले, त्यालाही दीड महिना झाला. लस निघाल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र हा विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचे राज्यातील काही शहरांतून दिसून येत आहे. मुंबईसह अमरावती, अकोला या शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथील प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काहीशी अशीच भीती व्यक्त करणारी परिस्थिती आहे.

- दीड महिन्यात १० हजार चाचण्या

जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात १७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे दीड महिन्यात ५८७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब तसेच खासगी लॅब मिळून १० हजार ६५३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्या लागल्या आहेत.

- आगीच्या भडक्यासारखा संसर्गाचा वेग

आगीचा भडका उडावा, तितक्या वेगाने कोरोना संसर्गाचा वेग आहे. एक व्यक्ती कमीत कमी चार ते आठ व्यक्तींना बाधित करू शकते, तर किमान १० ते १५ व्यक्तींच्या चाचण्या कराव्या लागतात. तीन ते चार पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील काळात या संसर्गाचा वेग रोखण्याचे काम प्रामुख्याने नागरिकांना करायचे आहे.

पाईंटर-

- सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा.

- दोन व्यक्तींमध्ये शारीरीक अंतर राखा.

- घराबाहेर पडताच मास्कचा वापर करा.

- वारंवार हात साबणाने धुवा.

- शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रुमाल लावा.

-निष्काळजीपणा वाढलाय-

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजी मंडई, महाविद्यालय, मंदिर परिसरात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. परंतु नागरिकांकडून मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शारीरिक अंतराचे भानही आता ठेवले जात नाही. हा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.