शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी मार्च २०२० मध्ये आपण सगळे याच अविर्भावात होतो. सगळे गाफील राहिलो आणि बघता बघता उद्रेक झाला. आरोग्य यंत्रणा कोलमडली, परिस्थिती हाताबाहेर गेली. उपचार मिळेनात, रुग्णालयात बेड मिळेना... अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायची नसेल, तर स्वत:ची काळजी घ्या, मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा... होय, कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय.

गतवर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती सामान्य आहे. रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्वच नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता कोरोना संपला, लस आलेली आहे, आता काही होणार नाही... असाच समज अनेकांचा झाला आहे. परंतु हा समज काहीसा आत्मघातकी ठरू शकतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. धोका आजही कायम आहे.

जगाच्यादृष्टीने वाईट ठरलेले २०२० साल संपले, त्यालाही दीड महिना झाला. लस निघाल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र हा विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचे राज्यातील काही शहरांतून दिसून येत आहे. मुंबईसह अमरावती, अकोला या शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथील प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काहीशी अशीच भीती व्यक्त करणारी परिस्थिती आहे.

- दीड महिन्यात १० हजार चाचण्या

जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात १७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे दीड महिन्यात ५८७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब तसेच खासगी लॅब मिळून १० हजार ६५३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्या लागल्या आहेत.

- आगीच्या भडक्यासारखा संसर्गाचा वेग

आगीचा भडका उडावा, तितक्या वेगाने कोरोना संसर्गाचा वेग आहे. एक व्यक्ती कमीत कमी चार ते आठ व्यक्तींना बाधित करू शकते, तर किमान १० ते १५ व्यक्तींच्या चाचण्या कराव्या लागतात. तीन ते चार पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील काळात या संसर्गाचा वेग रोखण्याचे काम प्रामुख्याने नागरिकांना करायचे आहे.

पाईंटर-

- सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा.

- दोन व्यक्तींमध्ये शारीरीक अंतर राखा.

- घराबाहेर पडताच मास्कचा वापर करा.

- वारंवार हात साबणाने धुवा.

- शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रुमाल लावा.

-निष्काळजीपणा वाढलाय-

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजी मंडई, महाविद्यालय, मंदिर परिसरात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. परंतु नागरिकांकडून मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शारीरिक अंतराचे भानही आता ठेवले जात नाही. हा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.