शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

सावधान... कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झालाय... त्यावरील लस सुध्दा उपलब्ध झालीय... आता आपणाला काय होतंय... गेल्यावर्षी मार्च २०२० मध्ये आपण सगळे याच अविर्भावात होतो. सगळे गाफील राहिलो आणि बघता बघता उद्रेक झाला. आरोग्य यंत्रणा कोलमडली, परिस्थिती हाताबाहेर गेली. उपचार मिळेनात, रुग्णालयात बेड मिळेना... अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायची नसेल, तर स्वत:ची काळजी घ्या, मास्क लावा, शारीरिक अंतर ठेवा... होय, कोरोना संसर्ग पुन्हा वाढतोय.

गतवर्षीच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील आजची कोरोनाची स्थिती सामान्य आहे. रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा खूप कमी झाली आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्वच नागरिक बिनधास्त झाले आहेत. आता कोरोना संपला, लस आलेली आहे, आता काही होणार नाही... असाच समज अनेकांचा झाला आहे. परंतु हा समज काहीसा आत्मघातकी ठरू शकतो. कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी झाला असला तरी तो संपलेला नाही. धोका आजही कायम आहे.

जगाच्यादृष्टीने वाईट ठरलेले २०२० साल संपले, त्यालाही दीड महिना झाला. लस निघाल्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी होईल असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र हा विषाणू पुन्हा डोकं वर काढत असल्याचे राज्यातील काही शहरांतून दिसून येत आहे. मुंबईसह अमरावती, अकोला या शहरात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे तेथील प्रशासकीय तसेच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काहीशी अशीच भीती व्यक्त करणारी परिस्थिती आहे.

- दीड महिन्यात १० हजार चाचण्या

जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ४१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात १७७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे दीड महिन्यात ५८७ नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅब तसेच खासगी लॅब मिळून १० हजार ६५३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्या लागल्या आहेत.

- आगीच्या भडक्यासारखा संसर्गाचा वेग

आगीचा भडका उडावा, तितक्या वेगाने कोरोना संसर्गाचा वेग आहे. एक व्यक्ती कमीत कमी चार ते आठ व्यक्तींना बाधित करू शकते, तर किमान १० ते १५ व्यक्तींच्या चाचण्या कराव्या लागतात. तीन ते चार पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील काळात या संसर्गाचा वेग रोखण्याचे काम प्रामुख्याने नागरिकांना करायचे आहे.

पाईंटर-

- सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा.

- दोन व्यक्तींमध्ये शारीरीक अंतर राखा.

- घराबाहेर पडताच मास्कचा वापर करा.

- वारंवार हात साबणाने धुवा.

- शिंकताना, खोकताना नाका-तोंडाला रुमाल लावा.

-निष्काळजीपणा वाढलाय-

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजी मंडई, महाविद्यालय, मंदिर परिसरात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. परंतु नागरिकांकडून मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शारीरिक अंतराचे भानही आता ठेवले जात नाही. हा निष्काळजीपणा अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.