शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रमाणपत्र : नगरसेवकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:38 IST

जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे एक हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनगरसेवकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणारमुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळास आश्वासन

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेवर राखीव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे एक हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी कोल्हापूरच्या आमदारांशी बोलताना दिली; त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांना पदावर कायम राहण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलविण्याची विनंती करण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे एक शिष्टमंडळ बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते.

‘मराठा आरक्षण’ या विषयावरील चर्चा झाल्यानंतर लागलीच आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष राज्यातील अपात्र ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विषयाकडे वेधले. राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत येथे निवडून आलेल्या एक हजाराहून अधिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या जातीची वैधता प्रमाणपत्रे सहा महिन्यांच्या आत सादर करता आलेली नाहीत.

विभागीय जात पडताळणी समितीने त्यांना मुदतीत वैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. यात लोकप्रतिनिधींचा काहीच दोष नाही; त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळून त्यांना कायद्याच्या आधारेच संरक्षण द्यावे, अशी विनंती आ. मुश्रीफ व आ. पाटील यांनी केली. पालकमंत्री पाटील यांनीही नेमकी वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.लोकप्रतिनिधींबाबतचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर राज्यपालांच्या सहीने अध्यादेश काढला जाईल, असे सांगितले.लोकप्रतिनिधींना न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाच्या ‘कलम ९ अ’ मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली असून, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.सन २००० मध्ये केलेल्या कायद्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु हा कायदा अडचणीचा ठरत असल्याने नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. उमेदवारांकडून कायदेशीर हमीपत्र घेऊन निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. आता ही मुदत एक वर्षाची करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर