शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रमाणपत्र : नगरसेवकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:38 IST

जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे एक हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनगरसेवकांना दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणारमुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळास आश्वासन

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेवर राखीव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सुमारे एक हजारांहून अधिक लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याकरिता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी कोल्हापूरच्या आमदारांशी बोलताना दिली; त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांना पदावर कायम राहण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलविण्याची विनंती करण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे एक शिष्टमंडळ बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते.

‘मराठा आरक्षण’ या विषयावरील चर्चा झाल्यानंतर लागलीच आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष राज्यातील अपात्र ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विषयाकडे वेधले. राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत येथे निवडून आलेल्या एक हजाराहून अधिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या जातीची वैधता प्रमाणपत्रे सहा महिन्यांच्या आत सादर करता आलेली नाहीत.

विभागीय जात पडताळणी समितीने त्यांना मुदतीत वैधता प्रमाणपत्रे दिली नाहीत. यात लोकप्रतिनिधींचा काहीच दोष नाही; त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टाळून त्यांना कायद्याच्या आधारेच संरक्षण द्यावे, अशी विनंती आ. मुश्रीफ व आ. पाटील यांनी केली. पालकमंत्री पाटील यांनीही नेमकी वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.लोकप्रतिनिधींबाबतचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकप्रतिनिधींना दिलासा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यानंतर राज्यपालांच्या सहीने अध्यादेश काढला जाईल, असे सांगितले.लोकप्रतिनिधींना न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाच्या ‘कलम ९ अ’ मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली असून, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.सन २००० मध्ये केलेल्या कायद्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु हा कायदा अडचणीचा ठरत असल्याने नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. उमेदवारांकडून कायदेशीर हमीपत्र घेऊन निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. आता ही मुदत एक वर्षाची करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर