शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आमरोळीत काजू कारखान्यावर वीज कोसळून भीषण आग; ९० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 22:06 IST

रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

- निंगाप्पा बोकडे

चंदगड : वीज कोसळून अचानक लागलेल्या आगीत आमरोळी येथील श्रीराम शेतीमाल प्रक्रिया काजू कारखान्याला आग लागून सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने  ८०० ते ९०० पोती काजू बिया ( ९० टन )  काजू यासह लाकूड, पत्रे  आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी काजू गोदमावर वीज कोसळून काजू पोत्यांनी पेट घेतला. पण त्यावेळी ते लक्षात आले नाही. सोमवारी दुपारी आगीने रौद्ररूप घेतल्यावर गडहिंग्लज येथील अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र काजूने इतका पेट घेतला की, पाण्याचा मारा अपुरा पडू लागला. यामध्ये सुमारे ८०० ते ९०० काजू पोती, गोडाऊनचे  ७५ सिमेंट पत्रे, २५ लाकडी खांब असे साहित्य जळून खाक झाले.

घटनेचा पंचनामा तलाठी रुपाली कांबळे, पोलिस पाटील मारुती नाईक, धोंडीबा नाईक,  विजयकुमार कांबळे, उत्तम वाईगडे, सुरेश वाईंगडे, प्रकाश वाईंगडे यांनी केला. घटनेची वर्दी कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राजाराम मंडलिक यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर