शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आमरोळीत काजू कारखान्यावर वीज कोसळून भीषण आग; ९० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 22:06 IST

रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

- निंगाप्पा बोकडे

चंदगड : वीज कोसळून अचानक लागलेल्या आगीत आमरोळी येथील श्रीराम शेतीमाल प्रक्रिया काजू कारखान्याला आग लागून सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने  ८०० ते ९०० पोती काजू बिया ( ९० टन )  काजू यासह लाकूड, पत्रे  आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी काजू गोदमावर वीज कोसळून काजू पोत्यांनी पेट घेतला. पण त्यावेळी ते लक्षात आले नाही. सोमवारी दुपारी आगीने रौद्ररूप घेतल्यावर गडहिंग्लज येथील अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र काजूने इतका पेट घेतला की, पाण्याचा मारा अपुरा पडू लागला. यामध्ये सुमारे ८०० ते ९०० काजू पोती, गोडाऊनचे  ७५ सिमेंट पत्रे, २५ लाकडी खांब असे साहित्य जळून खाक झाले.

घटनेचा पंचनामा तलाठी रुपाली कांबळे, पोलिस पाटील मारुती नाईक, धोंडीबा नाईक,  विजयकुमार कांबळे, उत्तम वाईगडे, सुरेश वाईंगडे, प्रकाश वाईंगडे यांनी केला. घटनेची वर्दी कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राजाराम मंडलिक यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर