शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Kolhapur Circuit Bench: लढ्यास यश; आंदोलकांवरील खटले अजून सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:58 IST

खटले मागे घेण्याची मागणी, वकिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे या मागणीसाठी आंदोलने करणारे वकील, पक्षकार आणि काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले. गेल्या १२ वर्षांपासून आंदोलक सुनावण्यांसाठी न्यायालयात खेटे मारत आहेत. आता सर्किट बेंचच्या मंजुरीमुळे शासनाने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.गेल्या ४२ वर्षांच्या खंडपीठ लढ्याला २००९ नंतर गती आली. वकिलांनी २०१२ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून खंडपीठ मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमुळे तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वकिलांवर गुन्हा दाखल केला होता. याबाबत वकिलांनी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीशांना भेटून अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी वकिलांकडून पत्र घेऊन पोलिसांना कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या.सप्टेंबर २०१५ मध्ये सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीन दिवस लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. त्यावेळी कोल्हापुरात ॲड. आर. एल. चव्हाण, अभिजित कापसे, प्रकाश मोरे यांच्यासह शंभराहून अधिक वकिलांवर गुन्हे दाखल झाले होते. सांगली, सातारा, म्हसवड, वाई येथेही वकिलांवर गुन्हे दाखल झाल्याने आंदोलन तापले होते.वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून केलेल्या आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. त्यावेळी सहा जिल्ह्यांतील वकिलांना कन्टेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा आल्या होत्या. त्यानंतर वकिलांनी उच्च न्यायालयात हजर राहून माफी मागितली. तसेच न्यायालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याची ग्वाही दिली.आत्मदहन आंदोलनाला १० वर्ष पूर्णथंडावलेले आंदोलन पुन्हा तीव्र करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये काही वकिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ॲड. विवेक घाटगे, कुलदीप कोरगावकर, पी. बी. दळवी, सरकारी वकील समीउल्ला पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव, समील पाच्छापुरे, उदय लाड आणि मनिषा नाईक यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा खटला सध्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर सुरू आहे. ॲड. प्रकाश मोरे हे या खटल्यात आंदोलकांची बाजू मांडत आहेत.

सरकारी वकील पदावर असतानाही मी सामाजिक हितासाठी आत्मदहन आंदोलनात सहभाग घेतला होता. आता सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. मागणी संपुष्टात आल्यामुळे आमच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. समीउल्ला पाटील - आंदोलकआत्मदहन आंदोलनातील गुन्ह्याचा खटला मी लढवत आहे. आंदोलकांनी सामाजिक भावनेतून ते कृत्य केले होते. आता सरकारने पुढाकार घेऊन सर्वच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. प्रकाश मोरे - आंदोलकांचे वकील