शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

Kolhapur Circuit Bench: लढ्यास यश; आंदोलकांवरील खटले अजून सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 13:58 IST

खटले मागे घेण्याची मागणी, वकिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे या मागणीसाठी आंदोलने करणारे वकील, पक्षकार आणि काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांवर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले. गेल्या १२ वर्षांपासून आंदोलक सुनावण्यांसाठी न्यायालयात खेटे मारत आहेत. आता सर्किट बेंचच्या मंजुरीमुळे शासनाने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.गेल्या ४२ वर्षांच्या खंडपीठ लढ्याला २००९ नंतर गती आली. वकिलांनी २०१२ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून खंडपीठ मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या बाचाबाचीमुळे तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वकिलांवर गुन्हा दाखल केला होता. याबाबत वकिलांनी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीशांना भेटून अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायाधीशांनी वकिलांकडून पत्र घेऊन पोलिसांना कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या.सप्टेंबर २०१५ मध्ये सहा जिल्ह्यातील वकिलांनी तीन दिवस लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. त्यावेळी कोल्हापुरात ॲड. आर. एल. चव्हाण, अभिजित कापसे, प्रकाश मोरे यांच्यासह शंभराहून अधिक वकिलांवर गुन्हे दाखल झाले होते. सांगली, सातारा, म्हसवड, वाई येथेही वकिलांवर गुन्हे दाखल झाल्याने आंदोलन तापले होते.वकिलांनी कामावर बहिष्कार टाकून केलेल्या आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. त्यावेळी सहा जिल्ह्यांतील वकिलांना कन्टेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटिसा आल्या होत्या. त्यानंतर वकिलांनी उच्च न्यायालयात हजर राहून माफी मागितली. तसेच न्यायालयीन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याची ग्वाही दिली.आत्मदहन आंदोलनाला १० वर्ष पूर्णथंडावलेले आंदोलन पुन्हा तीव्र करण्यासाठी १५ ऑगस्ट २०१५ मध्ये काही वकिलांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ॲड. विवेक घाटगे, कुलदीप कोरगावकर, पी. बी. दळवी, सरकारी वकील समीउल्ला पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद जाधव, समील पाच्छापुरे, उदय लाड आणि मनिषा नाईक यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा खटला सध्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर सुरू आहे. ॲड. प्रकाश मोरे हे या खटल्यात आंदोलकांची बाजू मांडत आहेत.

सरकारी वकील पदावर असतानाही मी सामाजिक हितासाठी आत्मदहन आंदोलनात सहभाग घेतला होता. आता सर्किट बेंचला मंजुरी मिळाली. मागणी संपुष्टात आल्यामुळे आमच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. समीउल्ला पाटील - आंदोलकआत्मदहन आंदोलनातील गुन्ह्याचा खटला मी लढवत आहे. आंदोलकांनी सामाजिक भावनेतून ते कृत्य केले होते. आता सरकारने पुढाकार घेऊन सर्वच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. - ॲड. प्रकाश मोरे - आंदोलकांचे वकील