शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुकाने बंद विषयात ‘धरलं तर चावतंय’ अशी अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

कोल्हापूर : दुकाने बंद विषयात जिल्हा प्रशासनाची ‘धरलं तर चावतंय...सोडलं तर पळतंय’ अशीच काही अवस्था झाल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरात ...

कोल्हापूर : दुकाने बंद विषयात जिल्हा प्रशासनाची ‘धरलं तर चावतंय...सोडलं तर पळतंय’ अशीच काही अवस्था झाल्याचे चित्र सोमवारी कोल्हापुरात दिसून आले. व्यापाऱ्यांनी कोल्हापूर व इचलकरंजी एकत्र करून स्वतंत्र युनिट करून व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी २१ जूनला केली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी दोन दिवस त्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्यात यश आले नाही. जिल्हा किंवा पोलीस प्रशासनाकडूनही वेगळे युनिट करण्यासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारून दुकाने सुरू केल्यानंतर मग पोलिसांकडून हालचाली झाल्या. हे आधीच झाले असते तर विनाकारण ताण-तणाव झाला नसता. आता तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून कोल्हापूर-इचलकरंजीसाठी दुकाने सुरू करण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.

कोल्हापुरात रोज सरासरी दीड हजार रुग्ण सापडत आहेत. मृत्यूही ३०च्या खाली यायला तयार नाहीत. गेल्या आठवड्यात दहा हजारांच्या खाली आलेली रुग्णसंख्या आता पुन्हा साडेअकरा हजारापर्यंत गेली आहे. त्यातच नवीन डेल्टा प्लस विषाणूचा धसका वाढला आहे. त्यामुळे प्रशासन निर्बंध कमी करायला तयार नाही. गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रुग्णसंख्या कमी आल्याने कोल्हापूर आपोआपच चौथ्या स्तरातून तिसऱ्या स्तरामध्ये जाईल, अशी शक्यता होती. परंतु तीदेखील फोल ठरली आहे. त्यामुळे शासन निर्बंध शिथिल करायला तयार नसल्याने प्रशासन त्यानुसार कारवाईच्या भूमिकेत आहे. दुसऱ्या बाजूला व्यापारी, व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. गेली तब्बल ८० दिवस दुकाने बंद आहेत. त्यामुळे सगळा व्यवहार ठप्प आहे. दुकानातील कामगारांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. दुकाने उघडावीत तर प्रशासन पाच हजार रुपये दंडाच्या पावत्या फाडत आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील सुमारे ५० टक्के दुकाने सुरू आहेत. मुख्यत: कापड, सराफ इलेक्ट्रानिक्स, चप्पल बाजार ही दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतकी दिवस बंद आहेत म्हणून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे, असेही चित्र व अनुभव नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय कार्यक्रम, मोर्चे, मेळावे, लग्नसमारंभ हे सगळे धडाक्यात सुरू आहे. बँकांच्या दारात रोज रांगा लागत आहेत. रस्त्यावरील गर्दी हटायला तयार नाही. तिथे कोणतेच निर्बंध नसताना मग ही ठरावीक दुकानेच बंद ठेवून कोरोनाला अटकाव कसा होणार आहे, अशी विचारणा व्यापारी करत आहेत व त्यात तथ्य आहे. त्यामुळे यातून काहीतरी सुवर्णमध्य काढण्याची आवश्यकता होती.

पर्याय असाही..

एकाचवेळी दुकाने सुरू झाल्यास जास्त गर्दी होईल, अशी भीती असेल तर ती सम-विषम दिवशी सुरू करता येतील. किंवा एक दिवस जीवनावश्यक व दुसऱ्या दिवशी इतर दुकाने सुरू केली तरी चालू शकतील. खरे तर आता जी गर्दी होत आहे, ती जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोरच जास्त होत आहे. लोक रोज सकाळी भाजीपाल्यासाठी पिशवी हातात घेऊन मंडईत फिरताना दिसत आहेत. त्यांना रोखणे हे कोरोनाला रोखण्याइतकेच अवघड बनले आहे.

दुहेरी नुकसान..

काही अटी घालून आता बंद असलेल्या दुकानांनाही परवानगी द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी असून, ती नक्कीच गैर नाही. कपड्यातील दुकानांत दैनंदिन उलाढाल न झाल्यास त्याचा साठा पडून राहतो. जेव्हा केव्हा दुकाने उघडतील तेव्हा लोक हा जुना स्टॉक आहे म्हणून माल घेण्यास नकार देतील, अशीही भीती आहे. त्यातून व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे, याचाही विचार जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे.