शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा, ‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:46 IST

खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.

ठळक मुद्देकॉल ड्रॉप, आवाजातील विस्कळीतपणा‘नो नेटवर्क’मुळे जनता झाली हैराण

कोल्हापूर : खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस्था अडखळीतही बीएसएनएलची सेवा अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे.गेला आठवड्याभरात खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. त्याचा फटका मोबाईलधारकांना बसत आहे. विशेषत: कॉल न लागणे, नेटवर्कची गती कमी असणे, बोलणे मध्येच कट होणे, आवाजात विस्कळीतपणा, आदी समस्यांमुळे अनेकांची घालमेल होत आहे.

सेवेतील विस्कळीतपणामुळे अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची कामेच होत नाहीत. विशेषत: वित्तीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांना या मनस्तापाला अधिक सामोरे जावे लागत आहे. बोलणे कमी झाल्यानंतर अनेकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर आपले कामकाज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही गती नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्याला याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगितले. याबाबत नागरिकांतून उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.‘बीएसएनएल’ अजूनही ‘बेस्ट ’सोमवारी सायंकाळी ५-४५ मिनिटांनी बीएसएनएलची प्रमुख नेटवर्क डाटा लाईन इस्लामपूर (ता. वाळवा, सांगली) येथे बंद पडली. यावर नेमका कुठे दोष आहे, याची माहिती मिळाल्यानंतर कोल्हापुरातील तांत्रिक पथकाने तेथे जाऊन हा दोष दूर करीत ही सेवा पुन्हा रात्री ८ वाजता पूर्ववत केली. विशेष म्हणजे ३१ जानेवारी रोजी बीएसएनएलचा सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी वर्गाने कंपनीच्या धोरणामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तरीसुद्धा यातील तीनशेहून अधिक कर्मचारी स्वेच्छेने दोष दुरुस्तीसाठी विनामोबदला रोज कार्यालयात येतात. यातही यातील काही कर्मचाºयांनी सहभाग घेत ही दोष दुरुस्ती केली.

 

 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर