शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्राय’च्या बदललेल्या नियमामुळे केबलचालकांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 14:59 IST

‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे

ठळक मुद्देअद्यापही २० टक्के ग्राहकांची कनेक्शन बंद : देखभाल खर्च गेला हाताबाहेर

विनोद सावंत कोल्हापूर : ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया)ने पसंतीनुसार चॅनेल निवड करण्याचा नियम केला. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन नियमाचा सर्वाधिक फटका केबलचालकांना बसला असून, त्यांचे कंबरडे मोडले आहे. नियमानंतर दहा महिने होत आले तरी जिल्ह्यातील २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन घेतलेली नाहीत. पूर्वीपेक्षा फायदा कमी झाल्याने केबलचालकांना देखभाल खर्च करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

‘ट्राय’ने १ फेब्रुवारी २०१९ पासून केबल संदर्भातील नियमात बदल केले. पसंतीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा ग्राहकांना दिली. मात्र, चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स खरेदी करणे बंधनकारक केले. यासाठी १५०० ते २००० रुपयांचा अधिक खर्च करावा लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी याकडे पाठ फिरवली. पूर्वी सुमारे १५० ते २०० रुपयांत मिळणाऱ्या चॅनेलसाठी आता २५० ते ३०० रुपये खर्च करावा लागत असल्यामुळे अनेकांनी केबल कनेक्शन पुन्हा सुरू केलीच नाहीत, हे वास्तव आहे.

  • जिल्ह्यातील केबल ग्राहक - सुमारे ४ लाख 

शहरातील केबल ग्राहक - ८० हजार केबल आॅपरेटर - १३०० 

  • पसंतीनुसार चॅनेल निवडीच्या नियमाला दहा महिने होत आले तरी २० टक्के ग्राहकांनी केबल कनेक्शन सुरू केलेली नाहीत. जिल्ह्यात सुमारे ८० हजार ग्राहकांचा यामध्ये समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचा फटका केबलचालकांसह सिस्टीमचालकांनाही बसत आहे. 

- यशोराज पाटील, जनरल मॅनेजर, बी टीव्हीफायदा ३५ टक्के झाला कमीएका ग्राहकामागे यापूर्वी १४० रुपयांचा फायदा मिळत होता. नवीन नियमामुळे हा फायदा ९० रुपयांवर आला आहे. चॅनेलने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा पैसे घेता येत नाहीत. त्यामुळे ३५ टक्के फायदा कमी झाला आहे. याचा परिणाम देखभाल खर्चावर होत आहे. कामगार पगार, केबल वायर, अ‍ॅम्प्लिफायर खराब झाल्यास दुरुस्तीचा खर्च हे सर्व हाताबाहेर गेले आहे.- संतोष पाटील, जरगनगर-रामानंदनगर केबलचालक महापुराचाही फटकाग्रामीण भागातील ग्राहक शेतीतील कामे झाल्यानंतर जूनमध्ये कनेक्शन पुन्हा सुरू करतील, अशी अपेक्षा केबलचालकांना होती. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराचा फटका जसा इतर व्यवसायांना बसला, तसा केबल व्यवसायाला बसला. महापुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे जूननंतरही केबल कनेक्शन घेण्यास अनेकांनी पाठ फिरविली.  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा