शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: चुकीचा अर्थ लावून आरळे गाव खालसा, जमिनी परत द्या

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 4, 2023 14:19 IST

जिल्हा प्रशासनाकडे तक्रार : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट जिल्ह्याला लागू नाही

इंदुमती गणेश कोल्हापूर : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट १९५३-५४ चा चुकीचा वापर करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरळे (ता. पन्हाळा) गाव खालसा करून आमच्या हक्काच्या जमिनी सरकार जमा झाल्या आहेत, त्यावर आता अतिक्रमण झाले आहे. आम्हाला आमच्या ३०० एकर जमिनी परत मिळाव्यात, यासाठी गायकवाड घराण्यातील वंशजांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याची माहिती समोर आली असून असे असेल तर खालसा झालेल्या गावांमधील हक्कदारांना जमिनी परत द्याव्या लागणार आहेत.शासनाने १९५३-५४ साली जहागिरी अबॉलेशन ॲक्टनुसार राज्यातील इनाम गावे खालसा करून जमिनी सरकार हक्कात घेतल्या. त्यात आरळे गावाचाही समावेश आहे. मात्र, जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याचे लक्षात आल्यानंतर बबनराव गायकवाड व दीपक गायकवाड यांनी २०११ पासून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला. या चुकीच्या खालस्यामुळे ३०० एकर जमीन सरकार हक्कात जाऊन तिथे अतिक्रमण झाले आहे. हक्कदार कुटुंबांवर अन्याय होऊन ते हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गायकवाड घराण्याचा इतिहास...गायकवाड घराण्यातील कृष्णाजी गायकवाड हे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान भेटीच्या प्रसंगी महाराजांसोबत होते. राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी १७४३ साली विश्वासू यशवंतराव गायकवाड यांना पन्हाळा, पावनगड येथील जमिनी सनदा करून दिल्या. आरळे येथील गायकवाड घराण्याच्या १६ वीरांचे लढाईत कामी आल्याबद्दल त्यांचे तेथे परडे पाहायला मिळतात व सती गेलेल्या स्त्रियांच्या शिळा उपलब्ध आहेत.वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितलाहे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जमिनी खालसा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याप्रकरणाचा चौकशी अहवाल देण्याचा आदेश केला होता. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीदेखील वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर