शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Kolhapur News: चुकीचा अर्थ लावून आरळे गाव खालसा, जमिनी परत द्या

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 4, 2023 14:19 IST

जिल्हा प्रशासनाकडे तक्रार : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट जिल्ह्याला लागू नाही

इंदुमती गणेश कोल्हापूर : जहागिरी अबॉलेशन ॲक्ट १९५३-५४ चा चुकीचा वापर करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आरळे (ता. पन्हाळा) गाव खालसा करून आमच्या हक्काच्या जमिनी सरकार जमा झाल्या आहेत, त्यावर आता अतिक्रमण झाले आहे. आम्हाला आमच्या ३०० एकर जमिनी परत मिळाव्यात, यासाठी गायकवाड घराण्यातील वंशजांकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रकरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याची माहिती समोर आली असून असे असेल तर खालसा झालेल्या गावांमधील हक्कदारांना जमिनी परत द्याव्या लागणार आहेत.शासनाने १९५३-५४ साली जहागिरी अबॉलेशन ॲक्टनुसार राज्यातील इनाम गावे खालसा करून जमिनी सरकार हक्कात घेतल्या. त्यात आरळे गावाचाही समावेश आहे. मात्र, जिल्ह्याला हा ॲक्ट लागू नसल्याचे लक्षात आल्यानंतर बबनराव गायकवाड व दीपक गायकवाड यांनी २०११ पासून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला. या चुकीच्या खालस्यामुळे ३०० एकर जमीन सरकार हक्कात जाऊन तिथे अतिक्रमण झाले आहे. हक्कदार कुटुंबांवर अन्याय होऊन ते हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला जमिनी परत मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

गायकवाड घराण्याचा इतिहास...गायकवाड घराण्यातील कृष्णाजी गायकवाड हे प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफझलखान भेटीच्या प्रसंगी महाराजांसोबत होते. राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी १७४३ साली विश्वासू यशवंतराव गायकवाड यांना पन्हाळा, पावनगड येथील जमिनी सनदा करून दिल्या. आरळे येथील गायकवाड घराण्याच्या १६ वीरांचे लढाईत कामी आल्याबद्दल त्यांचे तेथे परडे पाहायला मिळतात व सती गेलेल्या स्त्रियांच्या शिळा उपलब्ध आहेत.वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितलाहे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जमिनी खालसा झाल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याप्रकरणाचा चौकशी अहवाल देण्याचा आदेश केला होता. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीदेखील वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागितला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर