शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आजरा आगारातून तब्बल २६ दिवसानंतर बस सेवा सुरू, प्रवाशांमधून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 15:08 IST

आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगारातून आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या.

आजरा : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे एसटीची वाहतूक कोलमटली होती. मात्र, सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढत चांगली पगारवाढ दिली. तरीही काही कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. तर कामावर हजर व्हा नाहीतर कारवाईला सामोरे जा अशी सरकारने भूमिका घेतली आहे. यामुळे काही कर्मचारी भितीने कामावर हजर झाले आहेत. परिणामी काही ठिकाणी एसटीची वाहतूक सुरु झाली आहे.कोल्हापूर आगारातूनही काही प्रमाणात एसटीच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. यात आता आजरा आगारातूनही आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या. गडहिंग्लज, देवकांडगाव मार्गासह गवसे, नेसरी, लाटगाव या मार्गावर बाजारगाडी म्हणून बसेस धावल्या आहेत. नागरिकांची होणारी गैरसोय व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संप असतानाही चालक-वाहक यांनी एस.टी.सुरू करण्याबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे अशी माहिती आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगार व्यवस्थापक पृथ्वीराज चव्हाण गेले अनेक दिवस चालक वाहक यांना कामावर हजर होणे बाबत विनंती करीत आहेत. अखेर आज थोड्या प्रमाणात त्याला यश आले आहे. आजरा आगारातून चार बसेस सुरू झाले असून आणखीनही बसेस सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या निलंबनापेक्षा थोड्या प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आजरा आगारला यश आले आहे त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून बस स्थानकावर  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप