शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

बिल्डरांचा विकास, लोकांचे प्रश्न रखडले! पाचशे कोटी पडून : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:41 IST

गरिबांना घरे देण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे; तर शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, लीज होल्ड फ्री होल्ड असे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे पिंपरी-

प्राधिकरण भ्रम आणि वास्तव

विश्वास मोरे ।कोल्हापूर/पिंपरी : गरिबांना घरे देण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे; तर शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, लीज होल्ड फ्री होल्ड असे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) बरखास्तीची मागणी होत आहे. शिवाय या प्राधिकरणाचा पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) विलीनीकरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. प्राधिकरण झाल्यामुळे आजपर्यंत बिल्डरचाच विकास झाला आहे. धनदांडग्यांनी जागा घेऊन घरे बांधल्याचा आरोप लोकांतून होत आहे.

औद्योगिक नगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ रोजी करण्यात आली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडचे औद्योगिकीकरण होण्यास सुरुवात झाली होती. चिंचवड, आकुर्डी, रावेत, निगडी, काळेवाडी, थेरगाव, चिखली, भोसरी, तळवडे, वाल्हेकरवाडी अशा एकूण १० गावांच्या एकूण ४३२३ हेक्टर क्षेत्रापैकी १७२३ हेक्टर क्षेत्र नियोजन आणि नियंत्रणाखाली आहे. ४२ रहिवासी पेठा व चार व्यापारी पेठांचे नियोजन केले होते. एकूण संपादनाखाली असलेले क्षेत्र २५८४ हेक्टर आहे. त्यापैकी ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर असून, विकसित क्षेत्र १३२५ हेक्टर आहे. आजपर्यंत ३४ गृहयोजना राबविण्यात आल्या असून, २३१ व्यापारी वाणिज्य प्रयोजनाचे गाळे आहेत. प्राधिकरणाने ६९७९ निवासी आणि व्यापारी गाळ्यांची विक्री केली आहे. संपादनाखाली ५६ हेक्टर क्षेत्र येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ११ हजार २२१ सदनिकांची उभारणी झाली आहे.

प्राधिकरणाचा ५०० कोटींचा अर्थसंकल्प असून, दरवर्षी निधी खर्च होत नसल्याने तसेच नवीन प्रकल्प राबविले जात नसल्याने शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षांत एकही नवीन गृहप्रकल्प तयार झालेला नाही. स्थापनेपासून आतापर्यंतचा कालखंड पाहिल्यास उद्योगनगरीतील नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात प्राधिकरण कमी पडले आहे. बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे मूळ उद्देशापासून प्राधिकरण दूर गेले आहे. आजवरच्या एकूण कालखंडापैकी या समितीवर सर्वाधिक कालखंडात प्रशासकीय राजवट राहिली आहे. त्यामुळे द्रष्टे अधिकारी न मिळाल्याने विकासाला खोडा बसला आहे.सामान्यांची निराशा; घराचे स्वप्न अपुरेचसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राधिकरण सुरू झाले असले तरी ४६ वर्षांत केवळ साडेअकरा हजार सदनिकाच तयार केल्या आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नवीन घरकुले उभारलेली नाहीत. ‘प्राधिकरणात सामान्यांचे घराचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. प्राधिकरण सामान्यांसाठी नाही, धनदांडग्यांसाठी आहे. शेतकºयांचेही प्रश्न सुटलेले नाहीत. अनधिकृत बांधकामेही नियमित केलेली नाहीत़ त्यामुळे मूळ उद्देशापासून भरकटलेल्या प्राधिकरणाचा भाग महापालिकेत समाविष्ट करावा,’ अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली. या संस्थेची समिती स्वतंत्र असल्याने महापालिकेतील नगरसेवकांचा हस्तक्षेप तेथे नसतो.प्राधिकरणासमोरील आव्हानेसंपादित जमिनीवरील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, रिंग रोड विकास.चिंचवड, वाकड, काळेवाडी, थेरगाव, आकुर्डी परिसरात आरक्षण विकास.सेक्टर १२ मध्ये १० हजार क्षमतेचा गृहप्रकल्प उभारणे.शासनाच्या निर्णयानंतरही सुरू असलेली बांधकामे रोखणे.आंतरराष्टÑीय प्रदर्शन केंद्र विकास. रस्ते, उद्याने, शाळा आरक्षणांचा विकास.शेतकºयांना १२.५० टक्के परतावा देणे.प्रॉपर्टी कार्ड देणे. 

प्राधिकरणालाच परवान्यांचे अधिकारप्राधिकरणाचा विकास होत असतानाच नगरपालिका आणि महापालिका निर्माण झाली. त्यामुळे विकसनाचे अधिकार हे प्राधिकरणासच देण्यात आले होते. महापालिका क्षेत्रात जरी हे प्राधिकरण असले, तरी बांधकाम परवाने किंवा आरक्षणे विकसित करण्याचे अधिकार प्राधिकरणालाच आहेत. 

प्राधिकरणाच्या वतीने संपादित जमिनीवरील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण धोरण स्वीकारले आहे. अविकसित पेठाही विकसित करण्याचे नियोजन आहे. मध्यंतरीच्या कालखंडात नवीन गृहयोजना राबविल्या नाहीत. वाल्हेकरवाडी तसेच भोसरी परिसरात नवीन योजना राबविण्यात येणार आहेत. मूलभूत सुविधा देण्यास प्राधान्य असणार आहे. आंतरराष्टÑीय प्रदर्शन केंद्र विकास, रस्ते, शाळा आरक्षणांचा विकास होणार आहे.- सतीशकुमार खडके, मुख्याधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना