शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाचाकटेवाडीत झऱ्यावर चेंबर बांधा

By admin | Updated: June 4, 2015 00:44 IST

राजेंद्र सूर्यवंशी : ग्रामस्थ-कंत्राटदारात जुंपली; दिवसातून एकवेळ तरी पाणी देण्याची स्थानिकांची मागणी--लोकमतचा प्रभाव

कोपार्डे : येथील पाचाकटेवाडी (ता. करवीर) येथे ‘पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचा आधार’, अशी बातमी प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी लवकर पाचाकटेवाडीस भेट देऊन पाणीप्रश्नाबाबात ग्रास्थांबरोबर चर्चा केली व नवीन २२ लाखांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटदाराला कायम वाहणाऱ्या झऱ्यावर चेंबर बांधण्याचे आदेश दिले. यावेळी कंत्राटदाराने आरेरावी करीत आपण काम करणार नाही, अशी धमकी दिली. पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. एम. देसाई, एम. बी. पाटील पासार्डे पैकी पाचाकटेवाडीत बुधवारी सकाळी आठ वाजता पोहोचले. राजेंद्र सूर्यवंशी यांनी कामाची पाहणी करून ग्रामस्थांनी या योजनेबाबत जागरूक राहावे. या योजनेनंतर पुन्हा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळणे अवघड असल्याचे सांगितले. काम योग्य न झाल्यास या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणार आहे, असा इशारा कंत्राटदाराला दिला. उपअभियंत्याने कायम स्वरूपात वाहणाऱ्या डोंगरावरील झऱ्यावर आणखी दोन ते तीन फुटाची खोली वाढवत चेंबर बांधावा, त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करून पाणी योजना मार्गी लावावी, असा आदेश कंत्राटदार संजय पाटील यांना दिला. मात्र, यावेळी कंत्राटदार संजय पाटील यांनी अरेरावीची भाषा केल्यानंतर अशोक पायाकटे यांनी कंत्राटदार कोण? असा जाब विचारला. दोघांत बाचाबाची सुरू होऊन अशोक पाचाकटे हे संजय पाटील यांच्या अंगावर धावून गेले. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी झऱ्याचे पाणी लोक पितात. येथे दारूच्या बाटल्या पडल्याचे दाखवत कंत्राटदाराचे कामगार दारू पिऊनच येथे काम करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एम. बी. पाटील हे कुणाला काम दिल्याचे विचारले असता सांगत नाहीत, तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. साहेब काहीही करा, पण दिवसातून एक वेळ तरी पाणी द्या, अशी विनवणी गावकऱ्यांनी यावेळी केली.दरम्यान, कंत्राटदार संजय पाटील, सहा. कंत्राटदार संभाजी पाचाकटे यांनी आम्ही यापुढे योजनेचे काम करणार नाही, असा दम दिला. मात्र, ग्रामस्थांनी दोघा कंत्राटदारांना धारेवर धरल्यानंतर सहायक कंत्राटदार संभाजी पाचाकटे याने काढता पाय घेतला. त्यामुळे तीन वर्षानंतर तरी पाणीप्रश्न सुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर) पाणी योजनेच्या कामाची चौकशी कराया पाणीपुरवठा योजनेसाठी २२ लाखांचा निधी मंजूर झाला असला, तरी ही योजना काही लाखांत गुंडाळल्याचा आरोप सरदार पाचाकटे यांनी केला. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. काम मंजूर होऊन तीन वर्षे झाली असली, तरी अजून हे काम अपूर्ण आहे. जे केले आहे त्याचा स्लॅब खराब आहे, बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराला हटवा, अशी मागणी त्यांनी केली.