शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

पाचाकटेवाडीत झऱ्यावर चेंबर बांधा

By admin | Updated: June 4, 2015 00:44 IST

राजेंद्र सूर्यवंशी : ग्रामस्थ-कंत्राटदारात जुंपली; दिवसातून एकवेळ तरी पाणी देण्याची स्थानिकांची मागणी--लोकमतचा प्रभाव

कोपार्डे : येथील पाचाकटेवाडी (ता. करवीर) येथे ‘पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचा आधार’, अशी बातमी प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. करवीर पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी लवकर पाचाकटेवाडीस भेट देऊन पाणीप्रश्नाबाबात ग्रास्थांबरोबर चर्चा केली व नवीन २२ लाखांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटदाराला कायम वाहणाऱ्या झऱ्यावर चेंबर बांधण्याचे आदेश दिले. यावेळी कंत्राटदाराने आरेरावी करीत आपण काम करणार नाही, अशी धमकी दिली. पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. एम. देसाई, एम. बी. पाटील पासार्डे पैकी पाचाकटेवाडीत बुधवारी सकाळी आठ वाजता पोहोचले. राजेंद्र सूर्यवंशी यांनी कामाची पाहणी करून ग्रामस्थांनी या योजनेबाबत जागरूक राहावे. या योजनेनंतर पुन्हा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळणे अवघड असल्याचे सांगितले. काम योग्य न झाल्यास या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकणार आहे, असा इशारा कंत्राटदाराला दिला. उपअभियंत्याने कायम स्वरूपात वाहणाऱ्या डोंगरावरील झऱ्यावर आणखी दोन ते तीन फुटाची खोली वाढवत चेंबर बांधावा, त्याचबरोबर नळ पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करून पाणी योजना मार्गी लावावी, असा आदेश कंत्राटदार संजय पाटील यांना दिला. मात्र, यावेळी कंत्राटदार संजय पाटील यांनी अरेरावीची भाषा केल्यानंतर अशोक पायाकटे यांनी कंत्राटदार कोण? असा जाब विचारला. दोघांत बाचाबाची सुरू होऊन अशोक पाचाकटे हे संजय पाटील यांच्या अंगावर धावून गेले. यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी झऱ्याचे पाणी लोक पितात. येथे दारूच्या बाटल्या पडल्याचे दाखवत कंत्राटदाराचे कामगार दारू पिऊनच येथे काम करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एम. बी. पाटील हे कुणाला काम दिल्याचे विचारले असता सांगत नाहीत, तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. साहेब काहीही करा, पण दिवसातून एक वेळ तरी पाणी द्या, अशी विनवणी गावकऱ्यांनी यावेळी केली.दरम्यान, कंत्राटदार संजय पाटील, सहा. कंत्राटदार संभाजी पाचाकटे यांनी आम्ही यापुढे योजनेचे काम करणार नाही, असा दम दिला. मात्र, ग्रामस्थांनी दोघा कंत्राटदारांना धारेवर धरल्यानंतर सहायक कंत्राटदार संभाजी पाचाकटे याने काढता पाय घेतला. त्यामुळे तीन वर्षानंतर तरी पाणीप्रश्न सुटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर) पाणी योजनेच्या कामाची चौकशी कराया पाणीपुरवठा योजनेसाठी २२ लाखांचा निधी मंजूर झाला असला, तरी ही योजना काही लाखांत गुंडाळल्याचा आरोप सरदार पाचाकटे यांनी केला. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. काम मंजूर होऊन तीन वर्षे झाली असली, तरी अजून हे काम अपूर्ण आहे. जे केले आहे त्याचा स्लॅब खराब आहे, बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराला हटवा, अशी मागणी त्यांनी केली.