शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे लवकरच होणार पुनरुज्जीवन!

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.

मानाजी धुमाळ -- रेठरेधर--ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून १९४५ मध्ये दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी मच्छाला दरवाजे बसविण्यात येणार आहेत.ब्रिटिश राजवटीत रेठरेधरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाटाने सायफन पध्दतीने पाणी देण्यासाठी, गहू, शाळू, हरभरा या पिकांसाठी पाणी देण्यासाठी ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.तिळगंगा ओढ्याच्या पात्रामध्ये रेठरेधरण गाव पुलाच्या उत्तरेला विश्वास पाटील यांच्या घराजवळ हा बंधारा असून, याचे संपूर्ण बांधकाम घडविलेल्या दगडांपासून केले आहे. बंधाऱ्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १५0 फूट आहे व बंधाऱ्याचे पात्र सुमारे १00 मीटरपेक्षा जास्त आहे. या बंधाऱ्याला दोन दरवाजे आहेत. बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर अडविलेले पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय आहे. हे पाणी पाटाने सुमारे २ कि. मी. पर्यंत शेतीला जाण्याची सोय होती. या बंधाऱ्यास पूर्वी धरण म्हणून ओळखले जात होते. त्यावरुन रेठऱ्याचे नाव रेठरेधरण पडले.सध्या बंधाऱ्याचे बांधकाम चांगल्या स्थितीत असून, मच्छाला दरवाजे नाहीत व बंधाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या पाटाचे अंतर सुमारे २ कि. मी. असून, हा पाट बहुतांशी ठिकाणी बुजला आहे. बंधाऱ्याच्या पात्रामध्ये गाळ साचला असून, झुडपे उगवली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते.जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख, वाळवा तालुक्याच्या तहसीलदार सौ. रूपाली सरनोबत तसेच पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून रेठरेधरण बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाहणी केली. लवकरच बंधारा पात्रामधील गाळ काढणे, दरवाजे बसविणे आदी कामे सुरू होतील. रेठरेधरण येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. यामधील गाळ काढून पोटकालवा पुनरुज्जीवित करणे, धरणाची दुरुस्ती करणे आदी कामे जलसंधारण योजनेतून करण्यात येणार आहेत. हा बंधारा सुरु झाल्यानंतर शिवारातील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.- रणधीर नाईक, जि. प. सदस्यब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे बांधकाम ७० वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. सायफन पध्दतीने शेतीला पाणी मिळणार असल्याने रब्बी पिकांसह या पाण्याचा जमिनीत निचरा होऊन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुहेरी फायदा होणार आहे.- संजय घोरपडे, संचालक शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.