शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे लवकरच होणार पुनरुज्जीवन!

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.

मानाजी धुमाळ -- रेठरेधर--ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून १९४५ मध्ये दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी मच्छाला दरवाजे बसविण्यात येणार आहेत.ब्रिटिश राजवटीत रेठरेधरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाटाने सायफन पध्दतीने पाणी देण्यासाठी, गहू, शाळू, हरभरा या पिकांसाठी पाणी देण्यासाठी ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.तिळगंगा ओढ्याच्या पात्रामध्ये रेठरेधरण गाव पुलाच्या उत्तरेला विश्वास पाटील यांच्या घराजवळ हा बंधारा असून, याचे संपूर्ण बांधकाम घडविलेल्या दगडांपासून केले आहे. बंधाऱ्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १५0 फूट आहे व बंधाऱ्याचे पात्र सुमारे १00 मीटरपेक्षा जास्त आहे. या बंधाऱ्याला दोन दरवाजे आहेत. बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर अडविलेले पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय आहे. हे पाणी पाटाने सुमारे २ कि. मी. पर्यंत शेतीला जाण्याची सोय होती. या बंधाऱ्यास पूर्वी धरण म्हणून ओळखले जात होते. त्यावरुन रेठऱ्याचे नाव रेठरेधरण पडले.सध्या बंधाऱ्याचे बांधकाम चांगल्या स्थितीत असून, मच्छाला दरवाजे नाहीत व बंधाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या पाटाचे अंतर सुमारे २ कि. मी. असून, हा पाट बहुतांशी ठिकाणी बुजला आहे. बंधाऱ्याच्या पात्रामध्ये गाळ साचला असून, झुडपे उगवली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते.जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख, वाळवा तालुक्याच्या तहसीलदार सौ. रूपाली सरनोबत तसेच पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून रेठरेधरण बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाहणी केली. लवकरच बंधारा पात्रामधील गाळ काढणे, दरवाजे बसविणे आदी कामे सुरू होतील. रेठरेधरण येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. यामधील गाळ काढून पोटकालवा पुनरुज्जीवित करणे, धरणाची दुरुस्ती करणे आदी कामे जलसंधारण योजनेतून करण्यात येणार आहेत. हा बंधारा सुरु झाल्यानंतर शिवारातील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.- रणधीर नाईक, जि. प. सदस्यब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे बांधकाम ७० वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. सायफन पध्दतीने शेतीला पाणी मिळणार असल्याने रब्बी पिकांसह या पाण्याचा जमिनीत निचरा होऊन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुहेरी फायदा होणार आहे.- संजय घोरपडे, संचालक शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.