शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे लवकरच होणार पुनरुज्जीवन!

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.

मानाजी धुमाळ -- रेठरेधर--ब्रिटिशकालीन रेठरेधरणाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून १९४५ मध्ये दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याच्या पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी मच्छाला दरवाजे बसविण्यात येणार आहेत.ब्रिटिश राजवटीत रेठरेधरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाटाने सायफन पध्दतीने पाणी देण्यासाठी, गहू, शाळू, हरभरा या पिकांसाठी पाणी देण्यासाठी ओढा अडवून १९४५ मध्ये त्यावेळेचे सरपंच रंगराव ज्योती पाटील यांनी ब्रिटिश सरकारकडून हा बंधारा बांधला होता.तिळगंगा ओढ्याच्या पात्रामध्ये रेठरेधरण गाव पुलाच्या उत्तरेला विश्वास पाटील यांच्या घराजवळ हा बंधारा असून, याचे संपूर्ण बांधकाम घडविलेल्या दगडांपासून केले आहे. बंधाऱ्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे १५0 फूट आहे व बंधाऱ्याचे पात्र सुमारे १00 मीटरपेक्षा जास्त आहे. या बंधाऱ्याला दोन दरवाजे आहेत. बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर अडविलेले पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील दरवाजामधून बाहेर पडण्याची सोय आहे. हे पाणी पाटाने सुमारे २ कि. मी. पर्यंत शेतीला जाण्याची सोय होती. या बंधाऱ्यास पूर्वी धरण म्हणून ओळखले जात होते. त्यावरुन रेठऱ्याचे नाव रेठरेधरण पडले.सध्या बंधाऱ्याचे बांधकाम चांगल्या स्थितीत असून, मच्छाला दरवाजे नाहीत व बंधाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या पाटाचे अंतर सुमारे २ कि. मी. असून, हा पाट बहुतांशी ठिकाणी बुजला आहे. बंधाऱ्याच्या पात्रामध्ये गाळ साचला असून, झुडपे उगवली आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले होते.जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख, वाळवा तालुक्याच्या तहसीलदार सौ. रूपाली सरनोबत तसेच पाटबंधारे विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून रेठरेधरण बंधाऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी पाहणी केली. लवकरच बंधारा पात्रामधील गाळ काढणे, दरवाजे बसविणे आदी कामे सुरू होतील. रेठरेधरण येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. यामधील गाळ काढून पोटकालवा पुनरुज्जीवित करणे, धरणाची दुरुस्ती करणे आदी कामे जलसंधारण योजनेतून करण्यात येणार आहेत. हा बंधारा सुरु झाल्यानंतर शिवारातील रब्बी पिकांना लाभ होणार आहे. तसेच विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे.- रणधीर नाईक, जि. प. सदस्यब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे बांधकाम ७० वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. सायफन पध्दतीने शेतीला पाणी मिळणार असल्याने रब्बी पिकांसह या पाण्याचा जमिनीत निचरा होऊन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुहेरी फायदा होणार आहे.- संजय घोरपडे, संचालक शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.