शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

कामगार विमा रुग्णालय पूर्ववत एमआयडीसीत आणा

By admin | Updated: August 14, 2016 00:24 IST

चंद्रकांत पाटील : कृष्णा व्हॅली चेंबर आंदोलनाच्या तयारीत

कुपवाड : राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) चे रुग्णालय कुपवाड शहरामध्ये होते. परंतु, कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या वर्षभरापासून हे रुग्णालय अधिकाऱ्यांनी मिरजेत स्थलांतरित केले आहे. त्यामुळे सुविधांअभावी कामगार व उद्योजकांचे हाल होत असून त्वरित हे रुग्णालय कुपवाड एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करावे. अन्यथा आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही, असा इशारा कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कृष्णा व्हॅली चेंबर ही संघटना औद्योगिक बाबींशी संलग्न आहे. कारखानदार आणि सरकारी कार्यालये यामधील दुवा आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाविषयी राज्य कामगार विमा महामंडळाकडे लेखी व जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत तोंडी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. परंतु विमा महामंडळाचे वैद्यकीय अधिकारी जुजबी कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि उद्योजकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा उद्योग अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. वास्तविक या औद्योगिक क्षेत्रामध्ये एक हजार आस्थापना आहेत. त्यांच्याकडून एक दिवसाचाही विलंब न लावता दंडासह रक्कम वसुली केली जाते. मात्र, त्यांच्या कामगारांना सुविधा दिल्या जात नाहीत. सध्या हे रुग्णालय परिसरात नसल्यामुळे अनेक कामगारांचे हाल होऊ लागले आहेत. काही कर्मचाऱ्यांना अपंगत्व आले आहे. कामगारांच्या आरोग्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कामगारांच्या या समस्यांवर तातडीने विचारविनिमय करून निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबत शासनाकडून कोणतेही निर्णय घेण्यात येत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सुविधांअभावी कामगारांचे हाल होत असून त्वरित हे रुग्णालय कुपवाड एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)कामगारांना अपमानास्पद वागणूकराज्य कामगार विमा महामंडळाकडून नियुक्त केलेल्या काही रुग्णालयांतून कामगारांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याठिकाणी कामगारांना भीती दाखविण्याचे काम केले जाते. त्या खासगी रुग्णालयात कामगारांचे हित साधले जात नाही. या त्रस्त कामगारांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, असे साकडे कृष्णा व्हॅली चेंबरच्यावतीने ईएसआयसीच्या मुंबईतील आयुक्तांंना घालण्यात आले आहे.