शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या अडीच हजारासाठी दोघांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:58 IST

Crime News Court Kolhapur- व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर खाटीक यांचा दहा जणांनी पाठलाग करून तलवार, सत्तूर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. टेंबलाई रेल्वे फाटक उड्डाण पुलानजीक घडलेल्या घटनेला तब्बल सात वर्षांनी शनिवारी उजाळा मिळाला. या दुहेरी खूनप्रकरणी न्यायालयाने घायल कवाळे, हाणमा चव्हाणसह नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात वर्चस्ववादातून ही दुहेरी खुनाची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती.

ठळक मुद्दे सात वर्षांनी घटनेला उजाळा रेल्वे फाटक उड्डाण पूल परिसर घटनेने हादरला

कोल्हापूर : व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर खाटीक यांचा दहा जणांनी पाठलाग करून तलवार, सत्तूर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. टेंबलाई रेल्वे फाटक उड्डाण पुलानजीक घडलेल्या घटनेला तब्बल सात वर्षांनी शनिवारी उजाळा मिळाला. या दुहेरी खूनप्रकरणी न्यायालयाने घायल कवाळे, हाणमा चव्हाणसह नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात वर्चस्ववादातून ही दुहेरी खुनाची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती.थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, मृत समीर व आरोपी घायल कवाळे हे टेंबलाई झोपडपट्टीत शेजारी-शेजारी राहतात. २०११ मध्ये समीरचे कुत्रे हणमा चव्हाण व घायल कवाळे यांनी मारले व समीरच्याच घराच्या दारात जाळले होते. त्यातून कवाळे याने समीरचे घर पेटवले होते, तर त्या रागातूनच समीरने घायलच्या खुनाचा प्रयत्न केला होता.दरम्यान, कोटीतीर्थ परिसरातील नितीन शिंदे याच्या रमी क्लबवर समीर खाटीक व अमित हेगडे कामास होते. अमितने हणमा चव्हाणकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले, त्याची त्याने परतफेड केली, पण अडीच हजार रुपये व्याजावरून वाद वाढला. त्यात मध्यस्थी करताना नितीनचा हणमासोबत वाद झाला. त्यातून नंतर वाद वाढतच गेला. तत्पूर्वी नितीन व समीरला संपवण्यासाठी हणमा चव्हाण, घायल कवाळे व त्याच्या साथीदारांनी कट रचला.

दि. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी नितीन व समीर जेवण करून येऊन रेल्वे उड्डाणपूल चौकात उभारले. त्यावेळी हणमा, घायलसह आठ-दहाजण मोटारीतून आले. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. त्यावेळी समीरला उड्डाण पुलाखालीच संपवले, तर नितीनचा कोयास्को चौकापर्यंत पाठलाग करून त्याचा निर्घृण खून केला.आईनेच पाहिला मृतदेहमृत समीरची आई रात्रीच्यावेळी हॉटेलवरील काम आटोपून घरी परतत होती. त्यांना रेल्वे फाटकानजीक पुलाखाली कोणी तरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना सांगितले. पण तो मृतदेह त्यांच्या मुलालाच असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर