शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने शोधली रांगण्यावरील २ हजार फूट दरीत ढकललेली दुसरी तोफ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 19:40 IST

इसवी सन १८४४ च्या सुमारास गडक-यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील सहा तोफा दरीत ढकलल्या होत्या.

रमेश वारके

बोरवडेः १५ एप्रिलला पावणे दोनशे वर्षानंतर बोरवडे (ता.कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपने दोन हजार फुट दरीतून तोफ बाहेर काढल्यानंतर याच ग्रुपने चारच दिवसात दरीत शोध मोहिम राबविली.यामध्ये त्यांना यश आले असून दरीतील दुसरी तोफ बाहेर काढली आहे. रांगणा किल्ल्यावर ही तोफ आणली असून रांगण्याच्या कुशित ही तोफ आज विसावली. त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या या धाडसी मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी इसवी सन १८४४ च्या सुमारास गडक-यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील सहा तोफा दरीत ढकलल्या होत्या.आता अनेक वर्षानंतर या तोफा त्रिवेणी रांगणा ग्रुपचे मार्गदर्शक महादेव फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली  शोधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. कोकणातील नारुळ गावच्या दिशेला साधारणपणे १७०० फुट दरीत शोध मोहिमेच्या  दरम्यान ही तोफ त्यांना आढळली.साडे आठ फुट लांब असणारी,अंदाजे दोन टन वजनाची,पाठीमागील तोंडेचा साडे चार फुट घेरा आणि पुढील तोंडाचा सव्वा दोन फुट घेरा असणारी ही तोफ बाहेर काढण्यासाठी त्रिवेणी रांगण्याचे कार्यकर्ते गेली तीन दिवस झटत होते.  

या शोध मोहिमेत सुनिल वारके , प्रविण पाटील,बाजीराव खापरे,शरद फराकटे , अमर सातपूते , चंद्रकांत वारके , प्रकाश साठे ,जीवन फराकटे , मेजर सुनिल फराकटे , नेताजी साठे,रघुनाथ वारके , निखिल परीट, अरुण मगदूम , नेताजी सुर्यवंशी ,तानाजी साठे,बजरंग मांडवकर , अवधूत शिंगे , प्रथमेश पाटील, प्रज्योत चव्हाण ,भाऊ साठे,राहूल मगदूम हे शिवप्रेमी मावळे सहभागी आहेत. 

"किल्ल्यावरील सहाही तोफा शोधून त्या रांगण्याच्या कुशित वसविणे हेच आमचे ध्येय आहे.गडावरील अवशेष दरीत पडले असून त्यांंचा ढिगारा उपसताना शेजारीच साधारणपणे १७०० फुट दरीत ही तोफ दिसली.वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर या तोफा सरकत असून प्रत्येक वर्षी या तोफा आपल्या जागा बदलत आहेत.या तोफा बाहेर काढणे धोकादायक काम आहे" - महादेव फराकटे