शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

बॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:32 AM

बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देबॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढलीहंगामासाठी यंत्रणा सज्ज : नजरा ऊसदर आंदोलनाकडे

कोल्हापूर : बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.राज्य सरकारने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास २० आॅक्टोबरपासून परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे कारखाना प्रशासनाने गाळप हंगामाची तयारी केली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. आता प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.

सरकारने जरी २० आॅक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास मान्यता दिली असली, तरी ऊसदराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत हंगामाला गती येणार नाही. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना ऊसदराचा मुद्दा ताणणार हे निश्चित आहे.

एकरकमी एफआरपी हीच पहिली उचल, अशी कारखानदारांची मानसिकता दिसते; पण गेल्या वर्षीप्रमाणे एफआरपी अधिक ३00 -४00 रुपये मिळतात का? यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना प्रशासन जरी सज्ज झाले असले, तरी सगळ्यांच्या नजरा ऊसदर आंदोलनाकडे लागल्या आहेत. दराचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला वेग येणार नाही, हे निश्चित आहे.जिल्ह्यात या हंगामात १ कोटी ३८ लाख टन ऊस गाळपाचा अंदाज आहे. उसाचे क्षेत्र वाढले, तरी उसाच्या उत्पादनात फारशी वाढ होणार नाही, असा अंदाज साखर कारखान्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात १ कोटी ३३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा सलग पडलेला पाऊस आणि त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने ऊसवाढीवर परिणाम झाला आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर