शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 11:34 IST

बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देबॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढलीहंगामासाठी यंत्रणा सज्ज : नजरा ऊसदर आंदोलनाकडे

कोल्हापूर : बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.राज्य सरकारने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास २० आॅक्टोबरपासून परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे कारखाना प्रशासनाने गाळप हंगामाची तयारी केली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. आता प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.

सरकारने जरी २० आॅक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास मान्यता दिली असली, तरी ऊसदराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत हंगामाला गती येणार नाही. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना ऊसदराचा मुद्दा ताणणार हे निश्चित आहे.

एकरकमी एफआरपी हीच पहिली उचल, अशी कारखानदारांची मानसिकता दिसते; पण गेल्या वर्षीप्रमाणे एफआरपी अधिक ३00 -४00 रुपये मिळतात का? यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना प्रशासन जरी सज्ज झाले असले, तरी सगळ्यांच्या नजरा ऊसदर आंदोलनाकडे लागल्या आहेत. दराचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला वेग येणार नाही, हे निश्चित आहे.जिल्ह्यात या हंगामात १ कोटी ३८ लाख टन ऊस गाळपाचा अंदाज आहे. उसाचे क्षेत्र वाढले, तरी उसाच्या उत्पादनात फारशी वाढ होणार नाही, असा अंदाज साखर कारखान्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात १ कोटी ३३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा सलग पडलेला पाऊस आणि त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने ऊसवाढीवर परिणाम झाला आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर