शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बॉयलर पेटले; चिमण्या राहणार थंडच

By admin | Updated: October 26, 2014 00:05 IST

रघुनाथदादांची ३,५०० ची मागणी : राजू शेट्टी ऊस परिषदेत घोषणा करणार

कोल्हापूर : दसऱ्यापासून साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले असले तरी अजून महिनाभर चिमण्यांतून धूर बाहेर येणार नाही. दिवाळी व विधानसभेच्या धामधुमीनंतर शेतकऱ्यांचे नेते आता बाहेर पडल्याने येथून पुढे ऊसदराचे आंदोलन सुरू होणार असल्याने साधारणत: गेले वर्षीसारखाच उसावर ठोका पडण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.गेले वर्षी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत तीन हजारांची मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन शेवटपर्यंत ताणून धरले होते. अखेर एफ.आर.पी.शी सुसंगत असाच दर जाहीर करीत कारखानदारांनी १ डिसेंबरला चिमण्या पेटविल्या. यावर्षी वेगळी परिस्थिती आहे. केंद्राबरोबर राज्यातील सरकारही महायुतीचे आहे. त्यात साखरेचे दर पडल्याने उसाची पहिली उचल मागायची किती? महायुतीतील घटक पक्ष असल्याने आंदोलन करायचे कोणाविरोधात, या संभ्रमावस्थेत ‘स्वाभिमानी’चे नेते आहेत. संघटनेचे नेते महायुतीपेक्षा शेतकरी महत्त्वाचे म्हणत असले तरी गेले दहा वर्षांत विरोधात बसून कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. आता खासदार राजू शेट्टी हेच सत्तेत असल्याने आरोप व टीकेवर निश्चितच मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ऊस परिषदेत दराची किती मागणी होणार, त्यानंतर आंदोलनाची नेमकी दिशा कशी असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ३,५०० रुपयेच हवेत : रघुनाथदादा पाटील साखरेच्या दरावर उसाचा दर ठरविणे एकदम मूर्खपणाचे आहे. केंद्र सरकारने साखर फुकट वाटायची ठरविली म्हणून शेतकऱ्यांनी ऊस फुकट द्यायचा का? शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांनी राजू शेट्टी यांना हाताशी धरून साखरेवर उसाचा दर ठरविण्याचे कटकारस्थान केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. उत्पादन खर्च व नफ्यातील वाटा असे ३,५०० रुपये प्रतिटन पहिली उचल घेतल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. यंदाचा ऊस हंगाम व संघटनेची भूमिका याविषयी पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ज्या जाहीरनाम्याच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली, त्याचे पालन त्यांनी करावे. साखरेचे दर घसरले असले तरी त्याचा ऊस दराशी काहीच संबंध नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर दर मिळाला पाहिजे, हे कायदा सांगतो. उसाचा उत्पादन खर्च २,२०० रुपये व उर्वरित रक्कम नफ्यातून घालून साडेतीन हजार रुपये पहिली उचल द्यावीच लागेल.साखरेच्या दरावर उसाचा दर ठरविणे चुकीचे आहे, हे आम्हालाही कळते; पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार, असे सांगून खासदार राजू शेट्टी म्हणाले, कारखान्यांचे उत्पन्न वाढले तर चार पैसे शेतकऱ्यांना मिळणार याचे भान काही मंडळींनी ठेवावे. शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, अशा पद्धतीने धोरणे बदलली तर वर्षानंतर भाव मागायची गरज भासणार नसल्याचा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व राज्य बॅँकेची उचल यावरच पहिल्याच उचलीचा आकडा ठरणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पहिली उचल ऊस परिषदेत : शेट्टीसाखर व्यवसायाशी संबंधित केंद्र शासनाचे बहुतांश धोरण बदलण्यात यश आले असून, साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व राज्य बॅँकेची उचल यावर उसाच्या पहिल्या उचलीचा निर्णय घेणार असून, त्याची घोेषणा ऊस परिषदेत करणार असल्याचे ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. राजू शेट्टी म्हणाले, साखरेचे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, उसाची उपलब्धता याचा ठोकताळा करूनच उचलीबाबत निर्णय घेतला जातो. साखरेचे धोरण व कारखानदारांचा हिस्सा यावरच किती दर मागायचे हे ठरणार आहे. कच्या साखरेवरील आयात शुल्क २५ टक्के, निर्यात अनुदान तीन हजारांपर्यंत केले आहे. इथेनॉल १० टक्केवाढविले, त्याचा दर वाढविण्याचा प्रयत्न केल्याने बऱ्यापैकी अडचणी कमी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)