शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डोके लढवून खूनसत्र; सात खुनांचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:21 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हत्या केल्यानंतर तिचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. गेल्या चार वर्षांत सात खुनांचे गूढ कायम आहे. त्यांपैकी चार खुनांची पोलिसांना ओळखही पटविता आलेली नाही. या गूढ हत्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक बनला आहे. कट ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हत्या केल्यानंतर तिचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. गेल्या चार वर्षांत सात खुनांचे गूढ कायम आहे. त्यांपैकी चार खुनांची पोलिसांना ओळखही पटविता आलेली नाही. या गूढ हत्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक बनला आहे. कट रचून आणि डोके लढवून खूनसत्र हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फारच चिंताजनक आहे.वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे आढळून आले होते. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने ही बालिका कोण? तिचा खून कोणी केला? याचा उलगडा करवीर पोलिसांना झालेला नाही. वाघबीळ घाटातील झुडपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे शीर गायब होते. किडे-मुंग्या लागून धड कुजले होते. शवविच्छेदन करण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे करवीर पोलिसांनी त्या जागेवरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु हा तरुण कोण? त्याचा खून कोणी केला? हे प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर या तरुणाचा कसबा वाळवे गावानजीक उसाच्या शेतामध्ये निर्घृण खून केला होता. त्याची ओळख पटूनही मारेकºयांचा शोध लागलेला नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जुना राजवाडा व राधानगरीच्या पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करूनही अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत.रुकडी (ता. हातकणंगले) येथील डॉ. प्रज्ञा व उद्धव दत्तात्रय कुलकर्णी या दाम्पत्याच्या खुनाचे गूढ कायम आहे. शिवाजी पेठ येथील निवृत्ती चौक परिसरातील वृद्ध फिरस्ता नारायण रावबा देसाई (वय ७२, रा. मूळ गाव खोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचाही गोळी घालून खून झाला. गिरोली घाटात अज्ञात महिलेचा मृतदेह मिळून आला. मोरेवाडी येथेही तरुणाचा खून झाला. करवीर, जुना राजवाडा, राधानगरी, कोडोली पोलीस ठाणे हद्दीतील खुनांचा उलगडा झालेला नाही. मारेकºयांनी थंड डोक्याने आणि पुरावे पाठीमागे न सोडता खून केला असल्याचे पोलिसांचे मत आहे. गुंतागुंतीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात हातखंडा असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही हतबल झाले आहे.खुनाचे कारणविवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सर्वाधिक हत्या या अनैतिक आणि पूर्ववैमनस्यातून घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे.पोलीस अपयशी : जिल्ह्यात पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगारी वाढू लागल्याची चर्चा नागरिकांत आहे. लूटमार, खासगी सावकारकी, मटका, जुगार, दारूयांसारखे अवैध व्यवसाय जोमाने फोफावत असल्यामुळे गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याची वस्तुस्थिती आहे. या सर्व घटनांना आवर घालण्यात पोलीस मात्र अपयशी ठरले आहेत.